शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 09:24 IST

Delhi Suicide Case : राजधानी दिल्लीत सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणाने खळबळ माजली आहे. वसंत कुंज परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या चार मुलीसह आत्महत्या केली. 

Delhi Suicide News : दिल्लीतील रंगपुरी परिसरात एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ५० वर्षीय हिरालाल हे कुटुंबासोबत वसंत कुंज परिसरातील रंगपुरी भागात भाड्याच्या घरात राहत होते. चार मुलींसह आणि स्वतः विषारी पदार्थ खाऊन पाच जणांनी आत्महत्या केली. घरातून सडण्याचा वास येत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला तेव्हा हादरून गेले, कारण पाचही मृतदेह सडल्यामुळे दुर्गंधी येत होती. father and 4 daughters found dead in rented home in delhi)

पाच जणांची आत्महत्या, घटना नेमकी काय?

ही घटना दिल्लीतील रंगपुरी भागातील आहे. एका व्यक्तीने आपल्या चार मुलींनी विषारी पदार्थ खायला दिला. त्यानंतर स्वतःही खाल्ला. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) ही घटना समोर आली. पोलिसांनी ज्यावेळी घराचा दरवाजा तोंडून आत प्रवेश केला, ते दृश्य भयंकर होते. मृतदेह सडल्याने भयंकर दुर्गंधी येऊ लागली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल यांच्या चारही मुली अपंग होत्या. त्यांना चालता-फिरता येत नव्हते. हिरालाल यांच्या पत्नीचे आधीच निधन झालेले आहे. त्यामुळे मुलीची सगळी जबाबदारी हिरालाल यांच्यावर येऊन पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

आत्महत्येचे कारण काय?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार हिरालालने मुली अपंग असल्याने आणि त्यांची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने हे पाऊल उचचले असावे. काम करणे आणि मुलींची जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा ताण असह्य झाल्याने हिरालालने मुलींसह आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 

नीतू (वय १८ वर्ष), निशी (वय १५ वर्ष), निरू वय (१० वर्ष ) आणि निधी (वय ८ वर्ष) अशी मयत मुलींची नावे आहेत. त्यांना अपंगत्वामुळे चालता फिरता येत नव्हते. 

घरात सडत होते पाच जणांचे मृतदेह

वसंत कुंज परिसरातील स्पायनल इंजरी हॉस्पिटलमध्ये कारपेंटर म्हणून हिरालाल काम करत होते आणि मुलीची काळजी घेत होते. पण, शुक्रवारी हिरालाल याच्या घरातून घाण वास येऊ लागला. त्यामुळे एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. 

पोलीस घटनास्थळी आल्यानंतर परिसरातील लोकांनी सांगितले की, हिरालाल आणि त्यांच्या कुटुंबातील कुणीही बऱ्याच दिवसापासून बाहेर दिसलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी घरमालक आणि इतर काही जणांना घेऊन जाऊन दरवाजा तोडला. 

दरवाजा उघडताच वास वाढला. पोलिसांनी आत बघितले असता बेडवर हिरालालचा मृतदेह पडलेला होता. दुसऱ्या खोलीत चार मुलींचे मृतदेह बेडवर पडलेले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्फास खाऊन पाच जणांनी आत्महत्या केली असावी, तसे पुरावे घटनास्थळावर मिळाले आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे