शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! Insurance च्या पैशासाठी 9 वर्षांच्या लेकीची हत्या; असा झाला धक्कादायक प्रकरणाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 18:28 IST

Crime News : मुलीच्या नावे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - आई-वडील आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमीच तयार असतात. मुलांच्या आनंदातच तिचा आनंद असतो. पण याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलीच्या नावे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लुधियानामध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. या दाम्पत्याला आर्थिक अडचण सतावत होती. त्यामुळे त्यांनी पैशासाठी हे क्रूर कृत्य केलं आहे. पोलीस तपासात याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पिंकी आणि तिचा नवरा नरिंदरपाल या दोघांनीही भारती या पिंकीच्या नऊ वर्षीय मुलीचा 19 जून रोजी खून केला. या दोघांनीही भारतीच्या नावावर 2018 मध्ये अडीच लाख रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतली होती. पोलिसांनी सांगितलं की या दोघांनी 2019 मध्ये तीन लाख रुपयांची जमीन खरेदी केली होती आणि हे त्या जमिनीचे हप्ते भरत होते. त्यांनी 1.49 लाखांचं कर्ज फेडलं होतं. मात्र उरलेलं कर्ज फेडायला त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी भारतीचा खून करुन तिच्या इन्शुरन्सच्या पैशातून आपलं कर्ज भरण्याचा प्लॅन केला होता.

नरिंदरपाल हा आपली पत्नी आणि सावत्र मुलगी भारती यांच्यासोबत राहत होता. पशुखाद्य बनवण्याच्या कारखान्यात तो काम करत होता आणि त्याच कारखान्याने दिलेल्या घरात राहत होता. भारती झोपेत असताना या दोघांनी तिला या कारखान्यामध्ये नेलं आणि पिंकी म्हणजे भारतीच्या आईने ओढणीने तिचा गळा आवळला. कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्यांनी भारती बेशुद्ध असल्याचं नाटक करत तिला रुग्णालयात पोहोचलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेजाऱ्यांनी देखील पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. 

शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नरिंदरपाल याला भारती आवडत नव्हती कारण ती त्याची सावत्र मुलगी होती. त्यामुळे तो तिला बऱ्याचदा मारहाणही करायचा. पिंकी आणि नरिंदरपाल या दोघांनीही सुरुवातील भारतीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचा दावा केला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालातून हे समोर आलं की तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर हे दोघेही कबूल झाले आणि आर्थिक अडचण असल्याने मुलीला मारल्याचं सांगितलं. तसेच पैशांसाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिसPunjabपंजाब