शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

४० वयाचा प्रियकर, २४च्या प्रेयसीने पळून जाऊन केलं लग्न, १२ वर्षांपासून सुरू होतं अफेअर; पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:44 IST

हे जोडपं लग्नानंतर वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं आणि त्यांनी सांगितलं की, तरूणीच्या घरातील लोक या लग्नाच्या विरोधात आहेत. आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे.

प्रेम ही गोष्टच माणसांना एकमेकांशी जोडून ठेवते. यात ना वय महत्वाचं असतं ना कोणता बंधन. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमधून (Bareilly) अशीच एक घटना समोर आली आहे. इथे ४० वर्षीय व्यक्ती २४ वर्षीय तरूणीच्या प्रेमात (Love Story) पडली आणि मग दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. आता दोघांनीही पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. हे जोडपं लग्नानंतर वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं आणि त्यांनी सांगितलं की, तरूणीच्या घरातील लोक या लग्नाच्या विरोधात आहेत. आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे.

बरेलीच्या फतेहगंज पश्चिममध्ये राहणारा ४० वर्षीय जयवली सिंह याचं शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीसोबत गेल्या १२ वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते आणि दोघेही नेहमीच भेटत होते. प्रेयसीने सांगितलं की, जेव्हा ती प्रेमात पडली त्यावेळी तिचं वय केवळ १२ वर्ष होतं.

२५ जानेवारीला पळून जाऊन केलं लग्न

बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्नाचा प्लान केला आणि २५ जानेवारीला दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. दोघांनाही आयुष्यभर सोबत रहायचं आहे. पण लग्नानंतर प्रेयसीच्या घरातील लोक संतापले आहेत. दोघांनी पोलिसांकडे लिखित तक्रार दिली. ज्यात त्यांनी सांगितलं की, दोघांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी.

याप्रकरणी पोलीस अधिकारी रोहित सिंह सजवाण म्हणाले की,  त्यांच्यासमोर हे प्रकरण आलं आहे आणि ते यावर आवश्यक ती कारवाई करतील. दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून चर्चा करण्याचाही विचार असल्याचं ते म्हणाले. हे प्रकरण लवकर मार्गी लावलं जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट