शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:32 IST

Crime News : गुंजा वाचव, कुणाला तरी बोलव... हे शब्द चंदौलीतील गुंजा यादवचे आहेत. जी आपल्या बहिणीची आठवण करून रडते.

चंदौली : जवळपास ४० पोलीस आले होते. आम्ही त्यावेळी गच्चीवर होतो, हे लोक थेट घरात घुसू लागले. आम्ही गेट बंद करण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर या लोकांनी गेट ढकलून उघडला. आम्ही विरोध केला असता त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर एका लेडीज आणि जेंट्स कॉन्स्टेबलने मला पकडले. जेव्हा दीदीने मला पाहिले तेव्हा तिने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या खोलीत धाव घेतली आणि दरवाजा बंद केला. मात्र, गेट उघडून तिला मारले. थोडा वेळ ती मला फोन करत राहिली. गुंजा वाचव, कुणाला तरी बोलव... हे शब्द चंदौलीतील गुंजा यादवचे आहेत. जी आपल्या बहिणीची आठवण करून रडते आहे. हिस्ट्री शीटर कन्हैया यादवच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन्ही मुलींना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे निशाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताची बहिण गुंजा हिने केला आहे.

असं करू नको, दीदीचं लग्न होणार आहे...या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गावकरी आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. एसएचओला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. या घटनेने उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. घटना चंदौलीच्या मनराजपूर गावातील आहे. मृताची बहीण गुंजा कॅमेऱ्यासमोर म्हणाली, 'आम्ही पोलिसांना सांगत होतो की, असे करू नका साहेब, आमची परीक्षा आहे... दीदींचे लग्न होणार आहे. असे असूनही त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर खोलीतून आवाज येणे बंद झाले. एका हवालदाराने खाली खुर्ची नेली. मी म्हणाले, तुम्ही काय करत आहात. त्यावेळी मी त्याचा हात धरला तेव्हा मला रक्त लागल्याने झटकून दिले. त्यानंतर तो आत गेला. 5-10 मिनिटांनी सगळे बाहेर आले आणि म्हणाले, या मुलीला सोड. मग सगळे निघून गेले. तो निघून गेल्यानंतर 10 सेकंदातच आम्ही त्या खोलीत पोहोचलो. दीदी पंख्याला लटकत होती आणि जमिनीला स्पर्श करत तिचा पाय वाकले होते. एका वाक्यात गुंजा यादव म्हणाली की, पोलीस आले तेव्हा आम्ही दोघी बहिणी होतो. त्याच लोकांनी बहिणीला मारलं... ती रडतच राहिली. जेव्हा हे लोक आम्हाला सोडून जाऊ लागले.. आम्ही पळत जाऊन पहिले तर दीदीला साडीच्या हलक्या गाठीने बांधले होते. तिचा पाय जमिनीला स्पर्श करून वाकलेला होता. एका हाताने मी गाठ सोडली, ती खूप हलकी बांधली होती. दीदीला तिथे आडवे केले होते. दुचाकीस्वाराला विनंती केली.  मात्र, त्याने मोबाईल न देता पळ काढला. त्यानंतर आजीच्या मदतीने गावकऱ्यांना बोलावण्यात आले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मानेजवळ ओरखडे आहेतचंदौलीचे एसपी अंकुर अग्रवाल यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात घशाजवळ एक जखम आणि डाव्या जबड्याखाली छोटीशी जखम दिसून आली आहे. याशिवाय शरीरावर अंतर्गत किंवा बाहेरून कोणतीही जखम झालेली नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अज्ञात असे लिहिले आहे. व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे, व्हिसेरा पाठवला जाईल, अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी कारवाई केली जाईल. मीडियामध्ये बलात्काराची चर्चा होती. मात्र, कोणत्याही अंतर्गत भागाला दुखापत झालेली नाही.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेश