शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 21:29 IST

सहा पादचाऱ्यांचा समावेश 

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले.

पणजी - एप्रिल महिन्यात राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये २७ बळी गेले. यात सहा पादचारी तसेच एका सायकलस्वाराचा समावेश आहे. १ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले. 

वाहतूक खात्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महिनाभरात २८४ अपघातांची नोंद झाली. यातील २४ अपघातांमध्ये बळी गेले. उत्तर गोव्यात ६ आणि दक्षिण गोव्यात १८ असे अपघात घडले. १७ अपघातांमध्ये गंभीर इजा झाल्या. उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात ११ असे अपघात घडले. ७१ अपघात किरकोळ स्वरुपाचे होते. १७३ अपघातांमध्ये कोणालाही इजा झाली नाही. २७ बळींमध्ये उत्तर गोव्यातील अपघातांमध्ये ६ तर दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. यात ११ वाहनचालक, ६ पादचारी, ७ प्रवासी, १ सायकलस्वार व इतरांचा समावेश आहे. १६ जणांना गंभीर इजार झाल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले. उल्लंघनांविरुध्द पोलिसांनी आरंभलेल्या खास मोहिमेत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

- वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर केल्या प्रकरणी २७६ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले. 

- निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन हाकल्या प्रकरणी ५४४ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले.

- मद्यपान करुन वाहन चालविल्या प्रकरणी ५१९ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले. 

- काळ्या काचांचे वाहन वापरल्या प्रकरणी ४५२४ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले. 

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवाtraffic policeवाहतूक पोलीस