शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अँग्रो गोट फार्म कंपनीच्या नावाने ४१४ जणांची १ कोटी ३८ लाखाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 17:38 IST

Fraud Case : उल्हासनगरात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्दे उल्हासनगरात रवींद्रसिंग पन्नू, रमेश गुप्ता, इशाक अन्सारी व जगताप सिंग यांनी ऍग्रो गोट फार्म कंपनी स्थापन केली.गुंतवणूकदारा पैकी देवराम गावित यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, रवींद्रसिंग पन्नू, रमेश गुप्ता, इशाक अन्सारी व जगताप सिंग यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सदानंद नाईक

उल्हासनगर : ऍग्रो गोट फार्म कंपनीत जादा परताव्याचे आमिष दाखवून एकूण ४१४ जणांना पैसे गुंतवणूक करण्यास भाग पडून त्यांची १ कोटी ३८ लाख ३० हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ४ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

उल्हासनगरात रवींद्रसिंग पन्नू, रमेश गुप्ता, इशाक अन्सारी व जगताप सिंग यांनी ऍग्रो गोट फार्म कंपनी स्थापन केली. यामध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना पैसे गुंतवणूकीस भाग पाडले. गुंतवणूकदारा पैकी फिर्यादी असलेले देवराम किसन गावित यांच्यासह पहिल्या टीम मधील ३६३ नागरिकांनी ९० लाख १० हजार तर दुसऱ्या टीम मधील ५१ जणांनी ४८ लाख २० हजार असे एकूण ४१४ जणांनी १ कोटी ३८ लाख ३० हजाराची गुंतवणूक केली. १ जून २०१८ ते २० ऑगस्ट २०२० दरम्यान रिजेन्सी प्लाझा शांतीनगर येथे सदर प्रकार झाला. गुंतवणूकदारा पैकी देवराम गावित यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, रवींद्रसिंग पन्नू, रमेश गुप्ता, इशाक अन्सारी व जगताप सिंग यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 ऍग्रो गोट फार्म कंपनीत जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४१४ जणांची १ कोटी ३८ लाख ३० हजाराची फसवणूक करणाऱ्या चौघांचे दुसरीकडे असेच कनेक्शन आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत असून जादा आमिषाला बळी पडणाऱ्या नागरिकांनी आतातरी धडा घ्यावा. असा सल्ला यानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी नागरिकांना दिला. पोलीस अधिक तपास करीत असून असा प्रकार इतर ठिकाणी केला का? याबाबत माहिती घेत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर