शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

By admin | Published: June 11, 2016 10:56 PM

आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेतल्याशिवाय डंपर हलवू न देण्याचा पवित्रा गावकर्‍यांनी घेतल्याने पोलिसांची पंचाईत झाली होती.

लातूर : लातूर जिल्‘ातील विनाअनुदानित शिक्षक दिनकर निकम हे गेल्या १३ वर्षांपासून एका विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावित आहेत़ परंतू त्यांना अद्यापपर्यंत वेतनाविना सेवा बजावावी लागत आहे़ परंतू, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने रात्रीच्या वेळी किर्तनसेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़
घरात शिक्षणाचा वारसा नसतानाही बीएसस्सी बीपीएड पर्यंतचे शिक्षण घेऊन नौकरीच्या शोधासाठी भटकंती सुरु केली़ घरात माझे जास्तीचे शिक्षण झाल्यामुळे मला नक्की नोकरी मिळेल अशी आशा आई वडीलांसह कुटुंबातील सर्वांनाच होती़ परंतू, नौकरी काही मिळाली नाही़ जागा निघाली की मी इंटरव्युव्ह ला हजर राहत होतो़ जिल्‘ातच नाही तर परजिल्‘ातही अनेक ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्युव्ह दिला़ परंतू, यश काही मिळाले नाही़ अखेर २०१४ मध्ये औसा तालुक्यातील मोहरगा येथे शिक्षकाची नोकरी मिळाली़ उशिरा का होईना नोकरी मिळाल्यामुळे कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंदाला पारावारच उरला नव्हता़ परंतू, शाळा विनाअनुदानित असल्याने अनुदान मिळेल तेव्हाच पगार मिळेल असे संस्थाचालकांनी सांगितले़ याचा निरोपही मी घरी दिला़ परंतू, आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर नोकरी कर असा सल्ला घरच्यांनी दिला़ परंतू, १२ जणांच्या कुटुंबाचा संसार भागणार कसा या विवंचनेत होतो़ परंतू थोडा परमार्थिक अभ्यास असल्याने नोकरी करून मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा सुरु केली़ अन् त्यातून मिळालेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले़ १ ना २ वर्ष तब्बल १३ वर्ष पगारीविनाच नोकरी सुरु असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याबाबत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या माध्यमातून न्यायासाठी लढा सुरु आहे़ परंतू अजूनही शासनाला जाग येत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा़़़
घरात स्वत: मी, आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुले असा एकूण १२ जणांचा परिवार आहे़ नावालाच शेती त्यावरही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही़ त्यामुळे घरात एकमेव मी च नोकरीला होता़ मलाही पगार मिळत नसल्याने शाळेतूल मिळेल त्या वेळेत नविन गावाची निवड करून त्या गावात रात्री ९ ते ११ किर्तन करून मिळेल त्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले असून, दुष्काळी परिस्थितीत या किर्तन सेवेचाच आर्थिक आधार कुटुंंबाला मिळत आहे़