शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

निसर्ग वाचवण्यासाठी धोरण आखून काम करावे लागेल - मुख्यमंत्री विष्णुदेव साई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 09:29 IST

भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

रायपूर -  हवामान बदल हा संपूर्ण जगासाठी मोठा धोका आहे. निसर्ग, हिरवळ आणि नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा अधिक उपाययोजना आणि प्रयत्नांची गरज आहे. कारण यामुळे अनियमित पर्जन्यमान, दीर्घकाळापर्यंत दुष्काळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यासारख्या समस्यांमुळे राष्ट्र आणि जग दोघांवरही परिणाम होत आहेत अशी चिंता छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी व्यक्त केली. हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी रणनीती तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. 

मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या हस्ते दोन दिवसीय ‘छत्तीसगड क्लायमेट चेंज कॉन्क्लेव्ह २०२४’चं उद्घाटन करण्यात आले. त्याचसोबत बस्तर येथे 'छत्तीसगड राज्य कृती आराखडा ऑन क्लायमेट चेंज' आणि पारंपारिक आरोग्य पद्धतींवरील 'Ancient Wisdom' या पुस्तकाचे लोकार्पण केले. हवामान बदल आणि जागतिक आव्हाने यावर या कार्यक्रमातून चर्चा होत आहे.  भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, आपण निसर्गाशी खेळ करत अधिकच्या सुख सुविधेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ज्यातून नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती बनत आहे. जलवायू परिवर्तनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यावर उपाय शोधण्याबाबत २०१५ मध्ये पॅरिसमध्ये करार झाला होता. ज्यात १९६ देशांनी सहभाग घेतला आणि आज आपण पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या जागतिक समस्येवर आपल्या सगळ्यांना मिळून तोडगा काढायचा आहे आणि त्यात आपल्याला नक्की यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

छत्तीसगड क्लायमेट चेंज कॉन्क्लेव्ह २०२४ चं आयोजन करणाऱ्या राज्यातील विन विभाग आणि छत्तीसगड स्टेट सेंटर फॉर क्लायमेट चेंजच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. जलवायू परिवर्तनाच्या या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्याची भूमिका आणि भविष्यातील उपाययोजना मैलाचा दगड ठरेल असंही मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सांगितले. यावेळी वन आणि पर्यावरण मंत्री केदार कश्यप, आमदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अनुज शर्मा, पद्मश्री पुरस्कार विजेते फुलबासन यादव, पद्मश्री पुरस्कार विजेते हेमचंद मांझी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते जागेश्वर यादव उपस्थित होते. या कार्यक्रमात हवामान बदलावर आधारित लघुपट दाखवण्यात आला.

दरम्यान निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी येणाऱ्या पिढ्या सुरक्षित राहण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करावे लागेल. यात तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या आदिवासी समाजाला निसर्ग खूप जवळून समजतो. अंदमान आणि निकोबारमधील जरावा जमातीचे लोक पूर किंवा भूकंप येण्याआधीच ओळखतात आणि डोंगरावर जातात असं वन आणि पर्यावरण मंत्री केदार कश्यप यांनी सांगितले.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड