शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:39 PM

औरंगाबादेतील कटकटगेट परिसरातील बुधवारी मध्यरात्रीची घटना 

ठळक मुद्देवाद विकोपाला गेला आणि मित्राने चाकूने सपासप वार केले

औरंगाबाद : कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रिक्षात बसण्यावरून दोन मित्रात झालेल्या वादातून  शेख आसिफ (२२,रा. लेबर कॉलनी) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना कटकटगेट परिसरात आयपी मेसजवळ बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. 

लेबर कॉलनी परिसरातील रहिवासी शेख रिहान आणि आसिफ हे अन्य दोन मित्रासह कंदूरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. लेबर कॉलनी, कटकटगेट मार्गे ते आयपी मेस समोरून टीव्ही सेंटर रस्त्यावर आले. यावेळी आसिफ आणि रिहान यांच्या रिक्षात पुढच्या सिटवर  बसण्यावरून वाद झाला. यावेळी चालकाने रिक्षा थांबविली आणि ते दोघे खाली उतरले. वाद विकोपाला गेला आणि रिहाने स्वत:जवळील चाकू काढून आसिफवर जोरात दोन वार केले. या घटनेत आसिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे दृष्य पाहून त्याच्या सोबतचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले.  घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि डी.बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आसिफला घाटी रूग्णालयात दाखल केले.  अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  खूनाची घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आरोपी जिन्सी परिसरातील आहे. 

आरोपीला पोलिसांकडूनअटकआरोपी शेख रिहान हा पळून जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असल्याची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले दिसले. शिवाय घटनास्थळावरून चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. 

घटनास्थळी तणाव : आसिफचा चाकूने भोसकून खून झाल्याचे कळताच आयपी मेस परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तेथे तणावसदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती.