शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:51 IST

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. संजय शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे.

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनास खरमरीत पत्राद्वारे प्रतिउत्तर देणाऱ्या शिंदेगटातील आमदार संजय शिरसाट यांना आता सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याच औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे. 'मुख्यमंत्री भेटत नाहीत असे म्हणता, तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक 'रात्री' मुंबईत घालवता याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत, अशी आठवण करून देत येत्या निवडणुकीत बोलू, असा इशाराच शिवसैनिकाने आ. शिरसाट यांना दिला. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. 

राज्यातील राजकीय तिढा आता वेगळ्या वळणावर गेला असून उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता आणि पक्ष दोन्ही जातील अशी शक्यता निर्माण  झाली आहे. निर्णायक परिस्थितीत पुन्हा बंडखोरांशी जुळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सोशल मिडीयावर संवाद साधत भावनिक साद घातली. बंडखोरांतील एक असलेल्या औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना बंडखोरी का करावी लागली याची कारणे सांगितली. मुख्यमंत्र्यांनी भेट होत नव्हती, आमच्या जीवावर मोठे झालेले बडवे आम्हाला भेटू देत नव्हते, अशी अनेक कारणे त्यांनी पत्रात दिली आहेत. यावर सामान्य शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. एका शिवसैनिकाने तर आ. संजय शिरसाट यांना जाब विचारणारे पत्रच लिहिले आहे. ''आमच्या जीवावर निवडून आला आहात तर आमच्याही भावना ऐकून घ्या. तुम्ही आमच्यासाठी शिवसेनेने दाखवलेला दगड आहात. केवळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या जिव्हाळ्यामुळे तुम्हाला आम्ही मत देतो. एक रिक्षावाला असतानाही तीन वेळा आमदार झालात.  मुलाला नगसेवक म्हणून आमच्यावर लादले. मागच्या निवडणुकीत तुम्हाला विजयाची आशा नव्हती. मात्र शिवसैनिकांमुळे निवडून आलता. आता तुम्ही बंडखोरीचे कारण मुख्यमंत्री भेटत नाहीत दिले. तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईत घालवता, याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत. बोलण्यासारखे खूप आहे. येत्या निवडणुकीत बोलू.'' असा इशाराही पत्राद्वारे आ. शिरसाटांना या शिवसैनिकांनी दिला आहे. 

वाचा व्हायरल पत्र जशासतसे: प्रिय,संजय शिरसाट जी...शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदार संघातील एका शिवसैनिकाच्या भावना..आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्या आधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.शिरसाट जी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले.हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर...संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड...याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे.संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी सुद्धा आपली साथ सोडली होती.त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत So called हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदेच्या संपर्कात होते.पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती.तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा "रात्रीच्या" वेळी रडलात, हतबल झालात!अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती.पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत.तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मत ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो.असो बोलण्यासारखं खूप काही आहे...तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले.तुम्ही मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे..आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी.आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात.तर अमाच्याही भावना ऐकून घ्या.आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार...अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू.लोभ असावा...शिवसैनिक पदमपुरा,संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ