शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:51 IST

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. संजय शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे.

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनास खरमरीत पत्राद्वारे प्रतिउत्तर देणाऱ्या शिंदेगटातील आमदार संजय शिरसाट यांना आता सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याच औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे. 'मुख्यमंत्री भेटत नाहीत असे म्हणता, तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक 'रात्री' मुंबईत घालवता याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत, अशी आठवण करून देत येत्या निवडणुकीत बोलू, असा इशाराच शिवसैनिकाने आ. शिरसाट यांना दिला. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. 

राज्यातील राजकीय तिढा आता वेगळ्या वळणावर गेला असून उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता आणि पक्ष दोन्ही जातील अशी शक्यता निर्माण  झाली आहे. निर्णायक परिस्थितीत पुन्हा बंडखोरांशी जुळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सोशल मिडीयावर संवाद साधत भावनिक साद घातली. बंडखोरांतील एक असलेल्या औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना बंडखोरी का करावी लागली याची कारणे सांगितली. मुख्यमंत्र्यांनी भेट होत नव्हती, आमच्या जीवावर मोठे झालेले बडवे आम्हाला भेटू देत नव्हते, अशी अनेक कारणे त्यांनी पत्रात दिली आहेत. यावर सामान्य शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. एका शिवसैनिकाने तर आ. संजय शिरसाट यांना जाब विचारणारे पत्रच लिहिले आहे. ''आमच्या जीवावर निवडून आला आहात तर आमच्याही भावना ऐकून घ्या. तुम्ही आमच्यासाठी शिवसेनेने दाखवलेला दगड आहात. केवळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या जिव्हाळ्यामुळे तुम्हाला आम्ही मत देतो. एक रिक्षावाला असतानाही तीन वेळा आमदार झालात.  मुलाला नगसेवक म्हणून आमच्यावर लादले. मागच्या निवडणुकीत तुम्हाला विजयाची आशा नव्हती. मात्र शिवसैनिकांमुळे निवडून आलता. आता तुम्ही बंडखोरीचे कारण मुख्यमंत्री भेटत नाहीत दिले. तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईत घालवता, याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत. बोलण्यासारखे खूप आहे. येत्या निवडणुकीत बोलू.'' असा इशाराही पत्राद्वारे आ. शिरसाटांना या शिवसैनिकांनी दिला आहे. 

वाचा व्हायरल पत्र जशासतसे: प्रिय,संजय शिरसाट जी...शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदार संघातील एका शिवसैनिकाच्या भावना..आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्या आधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.शिरसाट जी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले.हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर...संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड...याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे.संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी सुद्धा आपली साथ सोडली होती.त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत So called हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदेच्या संपर्कात होते.पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती.तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा "रात्रीच्या" वेळी रडलात, हतबल झालात!अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती.पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत.तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मत ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो.असो बोलण्यासारखं खूप काही आहे...तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले.तुम्ही मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे..आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी.आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात.तर अमाच्याही भावना ऐकून घ्या.आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार...अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू.लोभ असावा...शिवसैनिक पदमपुरा,संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ