शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

यमनच्या जावयाला 'मुक्काम' पडला महागात; ८ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या भारतात, लग्नही केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:03 IST

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ८ वर्षांपासून औरंगाबादेत वास्तव्य उघडकीस आल्याने कारावासाची शिक्षा

औरंगाबाद : व्हिसाची मुदत संपल्यानंतरदेखील ८ वर्षांपासून भारतात बेकायदेशीररीत्या राहणारा यमनचा तरुण अली मोहम्मद अवद बीन हिलाबी (३१, रा. अबरार कॉलनी, बीड बायपास रोड मूळ रा. सना- ६०, यमन) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी ‘विदेशी नागरिक कायद्याच्या कलम १४ अन्वये’ एक वर्ष, एक महिना ६ दिवसांचा कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे न्यायलयाने आरोपीला शिक्षेविरोधात अपील करण्याची मुभा देऊन त्याचा पासपोर्ट परत करून त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही दिले आहेत.

याबाबत सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कारभारी नलावडे (५०) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी सेलकडून नियमितपणे विदेशी नागरिकांची तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान, यमन येथील ४ नागरिक शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी चौघांच्या कागदपत्रांची तपासणी करून चौकशी केली असता आरोपी अली मोहम्मद अवद हा गेल्या ८ वर्षांपासून अवैधरीत्या भारतात राहत असल्याचे समोर आले होते. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक दासरे यांनी तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. न्यायालयाने आरोपी अली मोहम्मद याला दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार व्ही.बी. साळवे यांनी काम पाहिले.

बनावट नागरिकत्वविशेष म्हणजे आरोपीने शहरातील तरुणीशी विवाह करून संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडे पोलिसांना भारताचे मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आढळून आले आहे. या पुराव्याआधारे त्याने भारताचे बनावट नागरिकत्व सिद्ध करण्याचा असफल प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग