शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जायकवाडी तुडुंब असल्याने यावर्षी पूर्ण क्षमतेने आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:17 PM

धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे.

ठळक मुद्देरबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे जायकवाडीतून उन्हाळी हंगामात पूर्ण क्षमतेने आवर्तन देण्याचे सूतोवाच गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

गुरुवारी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानबाद, लातूर जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. याबाबत माहिती देताना टोपे म्हणाले,  जायकवाडीत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे. रबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत. नांदूर मधमेश्वरमधून रबी हंगामात एक, तर उन्हाळी हंगामात २ आवर्तने दिली जाणार आहेत. निम्म दुधनात १३.३८ टक्केच पाणी असल्याने रबीसाठी एक अवर्तन देण्यात येणार आहे. माजलगाव प्रकल्पातून रबीसाठी २ व उन्हाळ्यात ४ आवर्तने दिली जातील. निम्म तेरणातून केवळ रबीसाठी ३ आवर्तने निश्चित केली आहे. मांजराचे  पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे.

२०४१ मध्ये हक्काच्या पाण्यावर गदाबैठकीत आ. अंबादास दानवे आणि प्रशांत बंब यांनी नांदूर-मधमेश्वर प्रकल्पात आरक्षण वाढविण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे आरक्षण वाढत गेले, तर २०४१ पर्यंत हक्काचे पाणी मिळणार नाही. त्या-त्या काळात दिल्या गेलेल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत शासनस्तरावर पुनर्विचार करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

७० टक्के जागा रिक्तजलसंपदा विभागात ७० टक्के कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, कं त्राटी पद्धतीने घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती