शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध'; 'मनसे'च्या मोर्चाने औरंगाबादचा पैठणगेट परिसर दणाणला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 'मनसे'च्या वतीने आज शहरात पैठणगेट येथून मोर्चा काढण्यात येत आहे.

औरंगाबाद : दुष्काळ नियोजनात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 'मनसे'च्या वतीने आज शहरात पैठणगेट येथून मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी पैठणगेट येथे मराठवाड्यातून शेतकरी आणि मनसे कार्यकर्ते जमले आहेत. 

पैठण गेट परिसरात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मोर्चात दंडुका आणण्यास पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रतिनिधीक स्वरूपात दंडुके आणि उसाचे टिपरू घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले आहेत. मोर्चात काळे कपडे परिधान करून सहभाग नोंदविण्यात आला आहे. बैलगाडीसह मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी 'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध' असे बॅनर लावलेल्या हेल्याने आणि यमाची वेषभूषा साकारलेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते दाखल होणे बाकी आहे.

या आहेत मागण्याशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कापसाला प्रतिक्‍विंटल ८ हजार रुपये भाव, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना पेन्शन, गत खरीप हंगामातील पिकविमा मिळावा, कोरडवाहु शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार, बागायतदारांना एक लाख अनुदान, गाव तेथे चारा छावण्या, मंडळानुसार नव्हे तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कृषिवीज बिले माफ करणे, कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई, बोंडअळीचे अनुदान मिळावे, पाणी टॅंकर सुरु करावे, तिथे प्रतिव्यक्‍ती ५० लीटर पाणी द्यावे, रोजगार हमीचे कामे सुरू करावी, उसाला एफआरपीप्रमाणे भाव, शैक्षणिक शुल्क माफीची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलनFarmerशेतकरी