शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चिंताजनक ! औरंगाबादेत दोन दिवसात कोरोनाचे चार बळी; रुग्णसंख्या ६८८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 9:11 PM

कोरोनाचा हा शहरातील १९ वा बळी ठरला आहे. तसेच आणखी चार पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या ६८८ वर गेली आहे.

ठळक मुद्देबुधवारी सकाळी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते

औरंगाबाद : शहरातील रहेमानिया कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला आधीपासून मधुमेह, उचरक्तदाब होता, अशी माहिती खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. कोरोनाचा हा शहरातील १९ वा बळी ठरला आहे. तसेच आणखी चार पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णसंख्या ६८८ वर गेली आहे. शहरात दोन दिवसात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शहरात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनीतील ९४ वर्षीय वृद्धेचा आणि गारखेडा परिसरातील हुसैन कॉलनीतील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सायंकाळी सिल्कमिल कॉलनी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या महिलेला मंगळवारी खाजगी रूग्णालयातून घाटीत रेफर करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ४ वाजता महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील रहेमानिया कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या चार मृत्यूमुळे दोन दिवसात शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.

आणखी ४ पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या ६८८ दरम्यान, रहेमानिया कॉलनी, सिल्लेखाना आणि शहाबाजार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भोकरदन ब( जि. जालना) येथील २० वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील रुग्णसंख्या ६८८ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू