शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

चिंताजनक ! औरंगाबाद जिल्ह्यात १७ हजार बालके कुपोषित; वर्षभरापासून प्रमाण कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:24 PM

जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाड्यांमध्ये येणारी बालके सुदृढ राहावी, यासाठी त्यांना पोषक आहार दिला जातो. मात्र, वर्षानुवर्षे दिला जाणारा ‘पोषण आहार’ हा खराच पौष्टिक आहे का? मुलांना त्यातून जीवनसत्वे मिळतात का? हा प्रश्न कुपोषित बालकांच्या आकडेवारीवरून उपस्थित झाला आहे. 

जिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख २८ हजार १०७ बालकांना पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यापैकी एप्रिलमध्ये २ लाख १९ हजार ५०६ बालकांचे वजन घेण्यात आले. तेव्हा २ लाख २ हजार २८२ बालके  सर्वसाधारण श्रेणीमध्ये असल्याचे दिसून आले. ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी दुसरी बाजू मात्र तेवढीच धक्कादायक आहे. मध्यम कमी वजनाची १३ हजार ९५० व तीव्र कमी वजनाची ३ हजार १४४ बालके आढळली आहेत. मध्यम व तीव्र कमी वजन या दोन्ही प्रकारातील बालके ही कुपोषित समजली जातात. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोेषणमुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योजना राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होत नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हाळ्यात बालकांचा आहार कमी होतो. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक ठिकाणचे हातपंप कोरडे पडले आहेत. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते की नाही, हे पडताळून पाहणारी यंत्रणा नाही. 

अनेक ठिकाणी मिळेल त्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. दूषित पाण्यामुळे बालकांना कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसारसारख्या रोगांचा सामना करावा लागतो. अंगणवाड्यांमार्फत संदर्भसेवा दिल्या जातात; पण अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी कुटुंबांकडे वेळ नसतो. परिणामी, या दिवसांत वजन कमी होण्याचे प्रमाण जास्त असते, असे उत्तर पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांकडून दिले जाते.

अन्नाअभावी कुपोषण नाहीयासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले, जिल्ह्यात अन्नाअभावी कुपोषण होणारी एकही घटना नाही. अन्न आहे; पण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आजारामुळे कुपोषणाची समस्या सर्वाधिक भेडसावते.जिल्हाभरात दर शनिवारी माता बैठका आयोजित करून पोषण, आहाराबाबत जागृती केली जाते. अलीकडे नव्याने महिला व बालविकास विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमार्फत कुपोषित बालकांवर विशेष लक्ष दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ४ ते १२ आठवड्यांपर्यंत बालकांवर उपचार केले जातात.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदStudentविद्यार्थी