शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अजिंठा, वेरूळचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात! पर्यटकांच्या वाढल्या तक्रारी, तातडीने उपाययोजना करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:15 IST

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित ‘पुरातत्त्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.  

औरंगाबाद : वेरूळ, अजिंठा लेणींना मिळालेला जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. यापूर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून ३ वारसास्थळे काढली आहेत. दिव्यांग, वृद्ध, विदेशी पर्यटकांची आर्थिक लूट, पाकीटमारी, चोऱ्या, लेणीत येणाऱ्या विक्रेत्यांविषयी पर्यटकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आल्याची चिंता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित ‘पुरातत्त्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.  

डाॅ. चावले म्हणाले, ‘जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा हा कायमस्वरूपी नसतो. तो टिकवावा लागतो. सध्या भारतातील नैसर्गिक वारसास्थळ असलेले मानस सरोवर आणि सांस्कृतिक वारसास्थळ असलेले हंपी ही स्थळेही ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. 

स्थानिक विक्रेते वेरूळ लेणीत प्रवेश करून विक्री करीत आहेत. तो पुरातत्त्व कायद्यानुसार गुन्हा असून, आम्ही त्यावर कारवाई करण्यास असमर्थ ठरतो. 

याविषयी पोलिस अधीक्षकांशी वैयक्तिक चर्चा केली असता त्यांनी गुन्हा घडल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाई केली पाहिजे.’ 

लेणीचे पाणी कनेक्शनही कापले -महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २०१९ मध्ये अजिंठा लेणीत जाणारे पाण्याचे कनेक्शन कापले. त्यामुळे ‘एएसआय’ पर्यटकांना जेमतेम पिण्यापुरते पाणी शुद्धीकरण करून उपलब्ध करून देत आहे, असेही डाॅ. चावले यांनी सांगितले.

लेणीतील चित्रांची हानी  - अजिंठा लेणीतील चित्रे नैसर्गिक रंगांनी बनवलेली आहेत. तेथे रोज पाच ते दहा हजार पर्यटक भेटी देतात. त्यांच्या श्वसनक्रियेमुळे आर्द्रता तयार होऊन तेथे ‘सिल्व्हर फिश’ची (कीटक) उत्पत्ती होऊन ऐतिहासिक चित्रांना हानी पोहोचत आहे. - पर्यटकांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी आम्ही तेथील इंटरप्रिटेशन सेंटर मागत असून, त्यातील चार लेणींच्या रिप्लिकातून पर्यटकांना लेणी समजावून घेता येतील.   

२० वर्षांत एकही बैठक नाही...जागतिक वारसास्थळाच्या आचारसंहितेनुसार दरवर्षी भागधारकांची बैठक होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, २००२ पासून बैठक झालेली नाही. लेणापूर परिसरात ५०० मीटरच्या बफर झोनमध्ये लेणीच्या वरच्या बाजूने बांधकामे होत आहेत. बफर  झोन वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, असेही डॉ. चावले म्हणाले.    

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळGovernmentसरकार