कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन

By Admin | Updated: May 28, 2014 00:40 IST2014-05-28T00:20:02+5:302014-05-28T00:40:11+5:30

हिंगोली : कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी मंगळवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला सरंक्षण अधिकारी अ‍ॅड. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Workshop Guidance on Family Violence Act | कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन

कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन

हिंगोली : कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी मंगळवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला सरंक्षण अधिकारी अ‍ॅड. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे होते. उपअधीक्षक निलेश मोरे, पियुष जगताप, स्थागुशाचे पोनि संग्राम सांगळे, जिल्हा विशेष शाखेचे पोनि कारेगावकर, महेंद्र देशमुख यांच्यासह इतर अधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. रेप व गँगरेपच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडित महिलेचा जवाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत हे काम करावे लागणार आहे. एखाद्या प्रकरणात उशीर झाल्यास विलंबाचे कारणही द्यावे लागणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अशी प्रकरणे चार्जशीट दाखल होईपर्यंत उघड करता कामा नये. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तातडीने नोंदवली जाण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन याच कार्यशाळेत पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी अधिकारी-कर्मचार्‍यांना ६ जूनपासून सुरू होणार्‍या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. ६७ जागांसाठी २ हजार २९५ अर्ज आले असून त्यामध्ये १ हजार ९५७ पुरूष तर ३३८ महिला उमेदवारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत पहिले चार दिवस कागदपत्रांची ढोबळ मानाने व सुक्ष्म तपासणी केली जाणार आहे. भरतीसाठी २५ मे २०१४ पुर्वीची प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत अधिकारी-कर्मचार्‍यांना ओळखपत्र बंधनकारक असून कुणालाही मोबाईल सोबत बाळगता येणार नाही. एखाद्या कर्मचार्‍याचा नातेवाईक भरतीसाठी आला असेल तर त्याच्याकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. तसेच अशा कर्मचार्‍यांना भरतीच्या ठिकाणाहून हटविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ६ ते २० जूनपर्यत चालणार असून पहिल्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी व उंची, छातीचे मोजमाप घेतले जाणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात चेस्ट क्रमांक देऊन उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Workshop Guidance on Family Violence Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.