शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:20 IST

फेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत २ हजार ४१७ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. २०१५ ते २०१९ पर्यंत ही योजना राबविण्यात आली असून, ‘कॅग’ने राज्यभरातील कामांवर ताशेरे ओढल्यामुळे विभागात ६ हजार २० गावांतील १ लाख ७४१६१ कामे संशयाच्या भोवऱ्यात होती. परंतु, आता सरकार बदलल्यामुळे ही योजना पुन्हा बाळसे धरणार असून, मागील सरकारच्या काळातील चौकशीचे आदेशही मागे घेण्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ‘कॅग’ अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून अनेक प्रश्न ‘कॅग’ने अहवालात उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेतील कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय झाला. या चौकशीमुळे विभागात मागील चार वर्षांत करण्यात आलेली कामे वादात आली. जालना, बीड जिल्ह्यातील कामांप्रकरणी चौकशीअंती कारवाईही झाली.

३१ मार्च २०२० पर्यंत औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालय अंतर्गत असलेल्या रेकॉर्डनुसार विभागात ९२.२३ टक्के खर्च करण्यात आला. ९४.१८ टक्के कामे त्यातून पूर्ण झाल्याचे रेकॉर्ड आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील ही महत्त्वाकांक्षी योजना होती. अनेक कामांत गुत्तेदारांची मर्जी राखली गेल्याचे २०१७ मध्ये आरोप झाले. यात अनेक गुत्तेदार हे २०१९ पर्यंतच्या सरकारच्या मर्जीतील होते, असे आरोप विरोधी पक्षाने केले. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त शिवार योजना म्हणून गणली गेली. आता ही योजना पुन्हा राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नेमली चौकशीफेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीने ६०० तक्रारींच्या अनुषंगाने ११२४ कामांची खुली चौकशी देखील सुरू केली, त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. चार वर्षांत ११.१४ टीसीएम पाणीसाठी साचल्याचे रेकॉर्डनुसार दिसते. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यातून झाल्याचाही दावा करण्यात आला. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३० ते १.५८ टक्के दरम्यान टीसीएम पाणीसाठा या योजनेतून निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

वर्ष --- गावांंची संख्या --- झालेला खर्च२०१५-१६--- १६८५--- ९६३ कोटी२०१६-१७-- १५१८---- ७९० कोटी२०१७-१८--- १२४८---             ३५२ कोटी२०१८-१९---- १५६९----             ३११ कोटीएकूण---- ६०२०-----             २४१७ कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाJalyukt Shivarजलयुक्त शिवार