शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:20 IST

फेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत २ हजार ४१७ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. २०१५ ते २०१९ पर्यंत ही योजना राबविण्यात आली असून, ‘कॅग’ने राज्यभरातील कामांवर ताशेरे ओढल्यामुळे विभागात ६ हजार २० गावांतील १ लाख ७४१६१ कामे संशयाच्या भोवऱ्यात होती. परंतु, आता सरकार बदलल्यामुळे ही योजना पुन्हा बाळसे धरणार असून, मागील सरकारच्या काळातील चौकशीचे आदेशही मागे घेण्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ‘कॅग’ अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून अनेक प्रश्न ‘कॅग’ने अहवालात उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेतील कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय झाला. या चौकशीमुळे विभागात मागील चार वर्षांत करण्यात आलेली कामे वादात आली. जालना, बीड जिल्ह्यातील कामांप्रकरणी चौकशीअंती कारवाईही झाली.

३१ मार्च २०२० पर्यंत औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालय अंतर्गत असलेल्या रेकॉर्डनुसार विभागात ९२.२३ टक्के खर्च करण्यात आला. ९४.१८ टक्के कामे त्यातून पूर्ण झाल्याचे रेकॉर्ड आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील ही महत्त्वाकांक्षी योजना होती. अनेक कामांत गुत्तेदारांची मर्जी राखली गेल्याचे २०१७ मध्ये आरोप झाले. यात अनेक गुत्तेदार हे २०१९ पर्यंतच्या सरकारच्या मर्जीतील होते, असे आरोप विरोधी पक्षाने केले. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त शिवार योजना म्हणून गणली गेली. आता ही योजना पुन्हा राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नेमली चौकशीफेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीने ६०० तक्रारींच्या अनुषंगाने ११२४ कामांची खुली चौकशी देखील सुरू केली, त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. चार वर्षांत ११.१४ टीसीएम पाणीसाठी साचल्याचे रेकॉर्डनुसार दिसते. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यातून झाल्याचाही दावा करण्यात आला. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३० ते १.५८ टक्के दरम्यान टीसीएम पाणीसाठा या योजनेतून निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

वर्ष --- गावांंची संख्या --- झालेला खर्च२०१५-१६--- १६८५--- ९६३ कोटी२०१६-१७-- १५१८---- ७९० कोटी२०१७-१८--- १२४८---             ३५२ कोटी२०१८-१९---- १५६९----             ३११ कोटीएकूण---- ६०२०-----             २४१७ कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाJalyukt Shivarजलयुक्त शिवार