शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते होणार तीन पदरी; ११२८ कोटींची कामे महिनाभरात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:24 AM

जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते तीन पदरी होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ११२८ कोटींची कामे अ‍ॅन्युटी- हायब्रीड (कंत्राटदाराच्या गुंतवणुकीचे टप्प्या-टप्प्याने बिल देणे) या योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते तीन पदरी होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ११२८ कोटींची कामे अ‍ॅन्युटी- हायब्रीड (कंत्राटदाराच्या गुंतवणुकीचे टप्प्या-टप्प्याने बिल देणे) या योजनेंतर्गत करण्यात येणार असून, बांधकाम विभागाने ७ निविदांपैकी ५ निविदा १९ जानेवारी रोजी उघडल्या आहेत. दोन कामांच्या फेरनिविदा मागवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २४५ कि़मी., तर जालना जिल्ह्यातील १३१ कि़मी. रस्ते तीन पदरी करण्यात येणार आहेत.

दोन पदर जड वाहनांसाठी तर उर्वरित रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा दावा अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केला. हायब्रीड अ‍ॅन्युटी या उपक्रमाला राज्यभरात औरंगाबादेत प्रतिसाद मिळाला आहे. महिनाभरात वर्कआॅर्डर होऊन कामे सुरू होतील. ३ कोटी रुपये प्रति कि़मी.पर्यंतचा खर्च होणार आहे.

१० मीटर रुंदीचे रस्ते डांबरीकरणातून केले जाणार आहेत. ३ पदरी रस्त्यांचे नियोजन असून त्यातील द्विपदरी भागातून जड वाहतूक जाईल, असे मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार आणि चव्हाण यांनी सांगितले. बांधकाम विभागाचा १५०० कोटींतून १३५० कि़मी. रस्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.