शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

भाकरीच्या शोधातील कामगारांना सोबतची भाकरही खाता आली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:39 IST

थकलेल्या जिवांना अवघ्या काही मिनिटांत गाढ झोप लागली आणि इथेच घात झाला.

ठळक मुद्दे तीन जण रुळापासून काही अंतरावर झोपले होते. ते मात्र बचावले. 

औरंगाबाद : गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास २० कामगारांनी अर्धपोटीच जालना सोडले. प्रत्येकाने सोबत पोळ्या, कणीक, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मीठ, मिरची पावडर आणि मसाल्याच्या पुड्या घेतल्या.  रस्त्यात भूक लागलीच तर प्रत्येकाने सोबत  दोन पोळ्या-भाकरी बांधून घेतल्या. सुमारे ४० किलोमीटर पायपीट केल्यानंतर थकवा आला म्हणून सर्व जण सटाणा शिवारात पहाटे ४ वाजेच्या सुमारास बसले. पाठीवरील पिशव्या रुळावर ठेवल्या आणि त्यावर डोके टेकविले. थकलेल्या जिवांना अवघ्या काही मिनिटांत गाढ झोप लागली आणि इथेच घात झाला. पहाटे भरधाव मालगाडीने या सर्वांना चिरडले. तीन जण रुळापासून काही अंतरावर झोपले होते. ते मात्र बचावले. 

रेल्वे रुळावर मृत्यूचे तांडवमृत्यूचे तांडव काय असते हे शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्याने अनुभवले. रात्रभर पायी चालून थकलेले जीव पहाटेच्या गार वाऱ्यात रेल्वे रुळावर काही क्षण विसावले अन् धडाडत आलेल्या रेल्वे मालगाडीने क्षणार्धात त्यांच्या अक्षरश: खांडोळ्याच केल्या. यात १६ जणांच्या  चिंधड्या झाल्या. एक गंभीर जखमी आणि तिघे थोडक्यात बचावले. औरंगाबादहून २५ कि.मी. अंतरावरील सटाणा (ता.जि. औरंगाबाद) गावाजवळ शुक्रवारी पहाटे ५.२२ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

हाडामासांचे तुकडे कपड्यात गोळा केले हा अपघात एवढा भीषण होता की, पोलिसांना कामगारांच्या हाडामांसाचे तुकडे अक्षरश: कपड्यात गोळा करावे लागले. कोणता अवयव कोणत्या व्यक्तीचा आहे,  हे ओळखणेसुद्धा अवघड झाले होते. अपघातात १४ कामगारांचे मृतदेह कपड्याचे गाठोडे बांधून जमा करावे लागले, तर दोन मजुरांनी घाटी रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण सोडला. या हृदयद्रावक घटनेने जिल्हा हादरला व हळहळलाही. रुळाच्या बाजूला झोपलेल्या तिघांचे प्राण सुदैवाने वाचले. 

मध्य प्रदेशचे पथक दाखल मध्यप्रदेशातील १६ मजूर सटाणा येथे मालगाडीखाली चिरडून ठार झाल्याचे समजल्यावर भोपाळ येथून चार्टर्ड विमानाने एक पथक औरंगाबादेत दाखल झाले. या पथकात आदिवासीमंत्री मिनासिंह, आयपीएस आधिकारी राजेश चावला, आयसीपी केसरीसिंह व अन्य एकाचा समावेश आहे. या पथकाने घटनास्थळ, घाटीला भेट देऊन जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी चर्चा केली. मृतदेह मध्यप्रदेशात कसे नेता येतील याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रात असलेल्या मध्यप्रदेशातील इतर कामगारांसंदर्भातही या पथकाने चर्चा केली. 

५,00,000 मदत मृतांच्या कुटुंबियांना- मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १६ मजुरांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत या मदतीची घोषणा केली. याशिवाय जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परराज्यांतील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत  जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने चर्चा सुरू आहे. लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूAccidentअपघात