शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीच्या शोधातील कामगारांना सोबतची भाकरही खाता आली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:39 IST

थकलेल्या जिवांना अवघ्या काही मिनिटांत गाढ झोप लागली आणि इथेच घात झाला.

ठळक मुद्दे तीन जण रुळापासून काही अंतरावर झोपले होते. ते मात्र बचावले. 

औरंगाबाद : गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास २० कामगारांनी अर्धपोटीच जालना सोडले. प्रत्येकाने सोबत पोळ्या, कणीक, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मीठ, मिरची पावडर आणि मसाल्याच्या पुड्या घेतल्या.  रस्त्यात भूक लागलीच तर प्रत्येकाने सोबत  दोन पोळ्या-भाकरी बांधून घेतल्या. सुमारे ४० किलोमीटर पायपीट केल्यानंतर थकवा आला म्हणून सर्व जण सटाणा शिवारात पहाटे ४ वाजेच्या सुमारास बसले. पाठीवरील पिशव्या रुळावर ठेवल्या आणि त्यावर डोके टेकविले. थकलेल्या जिवांना अवघ्या काही मिनिटांत गाढ झोप लागली आणि इथेच घात झाला. पहाटे भरधाव मालगाडीने या सर्वांना चिरडले. तीन जण रुळापासून काही अंतरावर झोपले होते. ते मात्र बचावले. 

रेल्वे रुळावर मृत्यूचे तांडवमृत्यूचे तांडव काय असते हे शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्याने अनुभवले. रात्रभर पायी चालून थकलेले जीव पहाटेच्या गार वाऱ्यात रेल्वे रुळावर काही क्षण विसावले अन् धडाडत आलेल्या रेल्वे मालगाडीने क्षणार्धात त्यांच्या अक्षरश: खांडोळ्याच केल्या. यात १६ जणांच्या  चिंधड्या झाल्या. एक गंभीर जखमी आणि तिघे थोडक्यात बचावले. औरंगाबादहून २५ कि.मी. अंतरावरील सटाणा (ता.जि. औरंगाबाद) गावाजवळ शुक्रवारी पहाटे ५.२२ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

हाडामासांचे तुकडे कपड्यात गोळा केले हा अपघात एवढा भीषण होता की, पोलिसांना कामगारांच्या हाडामांसाचे तुकडे अक्षरश: कपड्यात गोळा करावे लागले. कोणता अवयव कोणत्या व्यक्तीचा आहे,  हे ओळखणेसुद्धा अवघड झाले होते. अपघातात १४ कामगारांचे मृतदेह कपड्याचे गाठोडे बांधून जमा करावे लागले, तर दोन मजुरांनी घाटी रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण सोडला. या हृदयद्रावक घटनेने जिल्हा हादरला व हळहळलाही. रुळाच्या बाजूला झोपलेल्या तिघांचे प्राण सुदैवाने वाचले. 

मध्य प्रदेशचे पथक दाखल मध्यप्रदेशातील १६ मजूर सटाणा येथे मालगाडीखाली चिरडून ठार झाल्याचे समजल्यावर भोपाळ येथून चार्टर्ड विमानाने एक पथक औरंगाबादेत दाखल झाले. या पथकात आदिवासीमंत्री मिनासिंह, आयपीएस आधिकारी राजेश चावला, आयसीपी केसरीसिंह व अन्य एकाचा समावेश आहे. या पथकाने घटनास्थळ, घाटीला भेट देऊन जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी चर्चा केली. मृतदेह मध्यप्रदेशात कसे नेता येतील याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रात असलेल्या मध्यप्रदेशातील इतर कामगारांसंदर्भातही या पथकाने चर्चा केली. 

५,00,000 मदत मृतांच्या कुटुंबियांना- मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १६ मजुरांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत या मदतीची घोषणा केली. याशिवाय जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परराज्यांतील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत  जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने चर्चा सुरू आहे. लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूAccidentअपघात