शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

५५० कोटी रुपयांच्या कामांच्या ‘वर्कऑर्डर’ लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:31 IST

३१ मार्चपर्यंत काहीही हालचाल होणार नाही, रस्त्यांसह पुलांच्या कामांचा समावेश

- विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत नवीन कामांच्या ‘वर्कऑर्डर्स’ (कार्यारंभ आदेश) देण्याबाबत ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत निर्बंध आणल्यामुळे विभागातील सुमारे ५५० कोटी रुपयांच्या वर्कऑर्डर्स लालफितीत अडकल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील २०० कोटी, लातूर व नांदेड अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारीत असलेल्या प्रत्येक १७५ कोटी रुपयांच्या कामांच्या वर्कऑर्डर्सचा समावेश आहे. 

या कामांत रस्ते, पूल बांधणी व इतर काही शासकीय इमारतींच्या कामांचा समावेश आहे. सदरील कामे ३१ मार्चनंतरच सुरू होण्याची शक्यता सध्या तरी निर्माण झालेली आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये तफावत असल्यामुळे जास्तीची देणी विभागावर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी १५ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व विभागांच्या मुख्य अभियंत्यांना वर्कऑर्डर्स थांबविण्याबाबत पत्र दिले. त्यांच्या पत्रामुळे विभागात भूमिपूजनापर्यंत असलेली कामे थांबणार आहेत. विभागातील सर्व अधीक्षक अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामांची आकडेवारी जुळविण्यास सुरुवात केली असून, सूत्रांच्या माहितीनुसार अंदाजे ५५० कोटी रुपयांच्या कामांच्या वर्कऑर्डर सध्या तरी थांबल्या आहेत. 

विभागाकडून रस्ते व पुलांची कामे, परीक्षण, दुरुस्तीची कामे केली जातात. विभागातील रस्ते व पूल विकासकामांची संख्या व निधी उपलब्धतेचे प्रमाण यात विषमता आढळून आली आहे. तफावत असलेल्या सर्व कामांच्या वर्कऑर्डर ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित करण्याचा अहवाल मुख्य अभियंता पातळीवर तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विभागाची आढावा बैठकदेखील सोमवारी पार पडली. बैठकीत विभागातील सर्व कामांचा आढावा घेऊन त्याची माहिती विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बांधकाम विभागाचे मत असे औरंगाबाद-जालना अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांनी सांगितले, सचिव कार्यालयातून पत्र शुक्रवारी आल्यानंतर वर्कऑर्डरपर्यंत आलेल्या कामांचा आढावा घेतला आहे. दोन जिल्ह्यांत सुमारे २०० कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. विभागात तीन अधीक्षक कार्यालये आहेत. त्या ठिकाणच्या कामांचा निश्चित आकडा सांगता येणार नाही. मात्र उर्वरित सहा जिल्ह्यांत ३५० कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या वर्कऑर्डर थांबतील, असा अंदाज आहे. हायब्रीड व अ‍ॅन्युईटी योजनेंतर्गत असलेल्या रस्त्यांचे काम होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्गfundsनिधी