शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

२ महिन्यांपासून मानधनाविना काम

By admin | Updated: August 20, 2014 23:55 IST

हिंगोली : उन्हातान्हात गावागावात जाऊन काम करणाऱ्या पाणलोट व्यवस्थापनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे नेहमीच वांधे होत आहेत.

हिंगोली : उन्हातान्हात गावागावात जाऊन काम करणाऱ्या पाणलोट व्यवस्थापनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे नेहमीच वांधे होत आहेत. महिना दोन महिन्याआड उद्भवणाऱ्या या प्रश्नाचे मूळ खुद्द कर्मचाऱ्यांनाही समजले नाही. आधीच तुटपूंजे मानधन तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे बुधवारी कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली. एकात्मीक पाणलोट व्यवस्थापनतंर्गत मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपूंजे मानधनही वेळेवर मिळत नाही. अलिकडच्या सहा महिन्यांत हा प्रश्न नित्याचाच झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी तीन महिन्यांचे एकदाच मानधन मिळाले होते. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडावे लागले. आताही तोच कित्ता गिरवावा लागण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र विभाग असतानाही मानधनात आडकाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. महिन्याभरापासून तंत्र अधिकारी भंडारी यांच्या कार्यालयात कर्मचारी खेटे घालत आहेत; परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. गत आठवड्यात संपामुळे तंत्र अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटले नाहीत. उर्वरित वेळेत इतर कारणे कर्मचाऱ्यांना सांगितली जातात. वेतनाविना कर्मचाऱ्यांचे कामात लक्ष लागत नाही. घरखर्च भागवणेही अवघड झाले आहे. शिवाय प्रत्येक महिन्यात मानधनाला उशीर होत असल्याने कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेवून मानधनाची मागणी केली. (प्रतिनिधी)अधिऱ्यांच्या बोलण्यात तफावतकर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महिन्याच्या ४ तारखेला मानधन देण्याचे आदेश लातूर येथील विभागीय कार्यालयाने हिंगोली येथील तंत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत; मात्र लेखी मिळाले नसल्यामुळे ९ तारखेच्या पुढेच वेतन केले जात आहे; परंतु याचा दोन महिन्याच्या मानधनाशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचे कर्मचारी म्हणाले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांनी लातूर विभागातून निधी दिला नसल्यामुळे वेतन झाले नसल्याचे सांगितले; पण याच विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा शिपकुले यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्ह्यास निधी दिली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक महिन्याला विभागीय कार्यालयातून मानधन देण्याचा संबंध नाही. स्वतंत्र विभाग आणि मानधनाचे अधिकारही जिल्हा कृषी विभागास असल्याचे शिपकुले म्हणाले. दुसरीकडे तंत्र अधिकारी भंडारी यांनी जुलै महिन्याचे मानधन काढले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मानधन मिळाले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.