नवीन योजनेचे काम सुरू होणार
By Admin | Updated: May 23, 2014 00:24 IST2014-05-23T00:11:27+5:302014-05-23T00:24:25+5:30
कळमनुरी : शहरासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली.

नवीन योजनेचे काम सुरू होणार
कळमनुरी : शहरासाठी शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम एक ते दीड महिन्यात सुरू होणार आहे. या योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. इसापूर धरणापासून संपूर्ण शहरात व सर्व नवीन वस्त्यांत पाईपलाईन केली जाणार आहे. धरणाजवळ नवीन विहीर, पाणी स्टोरेज मशिन, शहराजवळ जलशुद्धीकरण केंद्र, नवीन वस्त्यांसह शहरातील पाईपलाईन या रकमेतून केल्या जाणार आहे. जुन्या पाईपलाईनचे पाणी काही वस्त्यांत येण्यासाठी अडचण निर्माण होत होती. शिवाय लिकेजेसही जास्त होते व नवीन वस्त्यात पाईपलाईन नव्हती. सध्या शहराला एक दिवसाआड प्रति माणसी ७० लिटर पाणी नळाद्वारे सोडल्या जात आहे. सध्या शहरात १ हजार ९९८ नळ कनेक्शन आहेत. नवीन पाणी पुरवठा योजनेनुसार नळ कनेक्शन वाढून न.प.च्या करातही भर पडणार आहे. सध्या इसापूर धरणातील १.३३ दलघमी पाणी न.प.ने आरक्षित केले आहे. ही पाणी पुरवठा योजना एक ते दीड वर्षात पूर्ण होवून सर्वच शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेसाठी खा. राजीव सातव, नगराध्यक्षा सादीया तबस्सूम म. रफीक आदींनी प्रयत्न केले. (वार्ताहर)