शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

महिलांची वेणी कापण्याचे लोण औरंगाबादेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 15:56 IST

राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबईमध्ये अज्ञातांनी महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडले आहेत. हे लोण आता औरंगाबादेतही दाखल झाल्याचा धक्कादायक  प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाईन लोकमत/ राम शिनगारे

औरंगाबाद, दि. १९ : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबईमध्ये अज्ञातांनी महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडले आहेत. हे लोण आता औरंगाबादेतही दाखल झाल्याचा धक्कादायक  प्रकार उघडकीस आला आहे. छावणीतील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी पतीसह गेलेल्या एका महिलेची वेणी कापण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकाराविषयी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शहरातील बेगमपुरा भागातील रहिवासी असलेल्या मंगला (नाव बदलले आहे.) या पतीसह गुरुवारी छावणीत भरणा-या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी सायं. ५.३० वाजेदरम्यान गेल्या होत्या. विद्यापीठातील काही मुलांसाठी  घरी मेस चालविण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी सुरू होती. बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने मंगला यांची वेणीच कापून टाकली. वेणीवर क्लिप लावलेली असल्यामुळे केस घटनास्थळी गळाले नाहीत. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा मंगला यांना काहीच सुचेना. त्यांना रडू कोसळले. भीती वाटू लागली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तेव्हा पतीने मंगलास धीर देत थेट छावणी पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी पोलिसांनी पर्सची दोरी कापताना वेणी कापली असेल, असे सांगितले. मात्र, पर्सला काहीच हानी पोहोचली नसल्याचे पीडितेने दाखवून दिले. त्यानंतर पोलिसांनी मंगला यांची केस कापल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे. केस कापण्याचा शहरात घडलेला हा पहिलाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

नेमका काय प्रकारउत्तर भारतामध्ये महिलांची वेणी कापण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात  हरियाणा १७, उत्तर प्रदेश ५, तर दिल्लीमधील ३ घटनांचा समावेश आहे. उत्तर भारतातील हे लोण मुंबईत दाखल झाले. मुंबईतील भायखळा, आग्रीपाडा, वडाळ्यात वेणी कापण्याचे प्रकार घडले आहेत. आता औरंगाबादेतही असाच प्रकार घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांचे दुर्लक्षछावणी पोलीस ठाण्यात सायं. ८ वाजेदरम्यान पीडित महिलेने वेणी कापल्याची तक्रार दाखल केली. ही तक्रार पोलिसांनी स्वीकारली. मात्र, एक दिवस उलटला तरी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. छावणीचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयीची माहिती संबंधित तक्रार घेणारांनी दिली नाही. तरी याविषयी तपास करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले.

महिलेची तब्येत बिघडलीवेणी कापल्याचा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेची तब्येत बिघडली आहे. घटना घडल्यापासून महिलने अंथरूण धरले आहे. केसांवरून गेले; पण कात्री तिच्या  गळ्याला लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. ही घटना आठवून प्र्रचंड भीतीने तिची तब्येत बिघडली असल्याचे पीडितेच्या सासूंनी सांगितले.

घटनांमागे केवळ विकृती आपण कोणत्या दिशेने जात आहोत, हेच कळत नाही. महिलांना बाहेर पडणे कठीण बनले. मुले आत्महत्या करीत आहेत. सर्वत्र सामाजिक समस्यांनी डोके वर काढले आहे. केस कापण्याच्या घटनांमागे केवळ विकृती हाच एकमेव प्रकार आहे. देशभरात सर्वत्र अशा घटना घडत आहेत. याचे लोण आपल्या शहरात पोहोचले. हे धक्कादायक आहे.-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्रज्ञ