शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

युतीशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्यच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:57 IST

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांची भूमिका : सेना-भाजपमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार; पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची सूचना करणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.रिपाइंच्या मराठवाडास्तरीय बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युतीच्या सत्ता सूत्रानुसार ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल. यासाठी शिवसेनेने बीजेपी सोबत राहिले पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपसोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार आहे. केंद्रात कॅबिनेट आणि महाराष्ट्रातही एखादे मंत्रीपद देऊन सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, असाही आपला प्रयत्न राहणार आहे. शिवसेना जर भाजपसोबत राहिली नाही, तर त्यामध्ये सेनेचेच नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला किमान २ जागा मिळाव्यात, विधानसभेत सेना-भाजपची युती झाली, तर रिपाइंला१४-१५ जागा, युती झाली नाही तर किमान २५-३० जागा दिल्या पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसंदर्भात आॅर्डिनन्स काढण्यासाठी आमचे केंद्रीय समाजकल्याण मंत्रालय विचार करीत आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये १८ जुलै ते १० आॅगस्ट या काळात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला संरक्षण देणारा आॅर्डिनन्स जारी करण्याचा विचार आहे. मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये मिळणाºया आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी कायदा करावा, अशी एससी, एसटी अधिकारी फोरमची मागणी आहे. नाणारच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, विकास हवा असेल, तर नाणार प्रकल्प झालाच पाहिजे; पण विस्थापितांचे नुकसान होता कामा नये. तेथील विस्थापित लोकांच्या पुनर्वसनासाठी बजेटमध्ये तरतूद व्हावी.रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपदमहाराष्ट्राच्या सत्तेत रिपाइंला वाटा मिळाला पाहिजे. महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा. तसेच आरपीआयला एक एमएलसी व एक मंत्रीपद मिळावे. राहिलेल्या एक- दीड वर्षासाठी का होईना आरपीआयला संधी मिळाली पाहिजे, यासाठी एक- दोन दिवसांतच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री