शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

युतीशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्यच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:57 IST

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांची भूमिका : सेना-भाजपमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार; पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची सूचना करणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.रिपाइंच्या मराठवाडास्तरीय बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युतीच्या सत्ता सूत्रानुसार ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल. यासाठी शिवसेनेने बीजेपी सोबत राहिले पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपसोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार आहे. केंद्रात कॅबिनेट आणि महाराष्ट्रातही एखादे मंत्रीपद देऊन सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, असाही आपला प्रयत्न राहणार आहे. शिवसेना जर भाजपसोबत राहिली नाही, तर त्यामध्ये सेनेचेच नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला किमान २ जागा मिळाव्यात, विधानसभेत सेना-भाजपची युती झाली, तर रिपाइंला१४-१५ जागा, युती झाली नाही तर किमान २५-३० जागा दिल्या पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसंदर्भात आॅर्डिनन्स काढण्यासाठी आमचे केंद्रीय समाजकल्याण मंत्रालय विचार करीत आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये १८ जुलै ते १० आॅगस्ट या काळात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला संरक्षण देणारा आॅर्डिनन्स जारी करण्याचा विचार आहे. मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये मिळणाºया आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी कायदा करावा, अशी एससी, एसटी अधिकारी फोरमची मागणी आहे. नाणारच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, विकास हवा असेल, तर नाणार प्रकल्प झालाच पाहिजे; पण विस्थापितांचे नुकसान होता कामा नये. तेथील विस्थापित लोकांच्या पुनर्वसनासाठी बजेटमध्ये तरतूद व्हावी.रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपदमहाराष्ट्राच्या सत्तेत रिपाइंला वाटा मिळाला पाहिजे. महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा. तसेच आरपीआयला एक एमएलसी व एक मंत्रीपद मिळावे. राहिलेल्या एक- दीड वर्षासाठी का होईना आरपीआयला संधी मिळाली पाहिजे, यासाठी एक- दोन दिवसांतच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री