शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

'आता दबाव आणण्याची गरज'; मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 19:03 IST

Marathwada Water Crisis : कृष्णा खोऱ्याला लागूनच मराठवाड्यात गोदावरी खोऱ्यातील मांजरा, तेरणा नदीची उपखोरे आहेत. यात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचे क्षेत्र आहे.

ठळक मुद्देपुणे विभागात जास्त पाणी वापरणार शासनावर दबाव आणण्याची गरज

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातील २८.६६ अब्ज घनफूट हक्काचे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कृष्णा खोरे महामंडळ, पुणे विभागाने ६३ अब्ज घनफूट जास्तीचे पाणी घेण्याचे नियोजन केले असून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याची शक्यता धूसर दिसत असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे. हक्काचे पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दबाव आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

मराठवाड्याचा भूभाग तीन नदी खोऱ्यांमध्ये विभागलेला आहे. त्यात गोदावरी खाेरे ८९ टक्के, कृष्णा खोरे ८.५ टक्के तर तापी खोरे २.५ टक्के क्षेत्रावर आहे. गोदावरी खोऱ्यातून १०२५ पैकी अंदाजे ३०० अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याला मिळते. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५ हजार ८३० चौ. किलोमीटर क्षेत्रासाठी फक्त ७१९ दलघमी पाणी वापर प्रस्तावित आहे. कृष्णा खोऱ्याला लागूनच मराठवाड्यात गोदावरी खोऱ्यातील मांजरा, तेरणा नदीची उपखोरे आहेत. यात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचे क्षेत्र आहे. या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात डॉ. माधव चितळे आयोगाच्या अहवालानुसार ४३ अब्ज घनफूट जास्तीचे पाणी असणे आवश्यक आहे. परंतु याबाबत निर्णय होत नाही. पुणे विभागाने मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यासाठी मोठा अन्याय केला असून विभागाला सापत्न वागणूक मिळत आहे, असा आरोप मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी केला आहे.

शासनावर दबाव आणण्याची गरजजलतज्ज्ञ नागरे यांनी सांगितले, २००५ साली औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत निर्णय झाला. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ३ उपसिंचन योजनांसाठी अतिरिक्त १४.६६ अब्ज घनफूट पाणी कृष्णा खोऱ्यातून मिळणे आवश्यक असल्याचा निर्णय २००९ साली फिरविण्यात आला. या तिन्ही योजना २३.६६ अब्ज घनफूट ऐवजी फक्त ७ अब्ज घनफूट पाणी वापरापुरत्या मर्यादित केल्या आहेत. शिवाय लातूर व इतर भागात गोदावरी खोऱ्यातून कृष्णा खोऱ्यात पोलवरम प्रकल्पाद्वारे दिलेले १४ अब्ज घनफूट हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासनावर दबाव आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाPuneपुणेNashikनाशिकState Governmentराज्य सरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प