शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

काँग्रेस देणार नवा शहराध्यक्ष? सोबत दोन कार्याध्यक्षही नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:57 IST

मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे.

ठळक मुद्देनिरीक्षकांच्या मते औरंगाबादला काँग्रेसची संघटनात्मक बांधणीच नाही. स्वबळावर लढण्याचे स्वप्नही पाहत नाहीत

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष नामदेव पवार यांना प्रदेश काँग्रेसवर एखादे पद देऊन नवा शहराध्यक्ष व त्यांच्या जोडीला दलित व धनगर समाजाला प्रतिनिधित्व म्हणून दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा विचार सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मनपा निवडणूक पाहता हे लगेच होईल की, निवडणूक झाल्यावरच असा बदल होईल, हे स्पष्ट व्हावयाचे आहे.

मागील लोकसभा निवडणुकीपासून बदलाचे संकेत मिळत होते; परंतु प्रत्यक्षात बदल काही होत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर तर शहराध्यक्ष बदला, अशी मागणी जोर धरू लागली होती. जोरदार लॉबिंगही करण्यात येत होते; परंतु प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, असे सांगितले जाते. सध्या मनपा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. काँग्रेससह सारेच राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज होत आहेत; परंतु काँग्रेससारख्या जुन्या व मोठ्या पक्षाची संघटनात्मक बांधणी औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या व कोणे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहरात अत्यंत कमजोर असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणी नाही. वॉर्डाध्यक्ष नियुक्त केले गेले नाहीत. बुथ कमिट्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रचना वॉर्डावॉर्डांतून बघावयास मिळत नाही. ही परिस्थिती आताही व भविष्यातही काँग्रेसला विजय मिळवू देऊ शकत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत बदल अटळ ठरत असून, ते न करणे ही मोठी चूक ठरू शकते. मनपा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने खरे तर संघटनात्मक बांधणीवर चांगले लक्ष द्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे स्वबळाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसला स्वबळावर फार तर ५० जागा लढवता येऊ शकतील. अनेक वार्डांमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड आहे. 

कालपासून शहराध्यक्ष नामदेव पवार हे मुंबईत आहेत. मध्यंतरी गांधी भवनात येऊन गेलेल्या तीन निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना देऊन टाकला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख हे लवकरच औरंगाबादला येणार असल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षकांच्या मते औरंगाबादला काँग्रेसची संघटनात्मक बांधणीच नाही. मुस्लिम शहराध्यक्ष व एक कार्याध्यक्ष दलित समाजाला व काही वॉर्डांमधील धनगर समाजाचे प्राबल्य पाहता एक कार्याध्यक्ष धनगर समाजाचा करावा, असा प्रस्ताव निरीक्षकांचा असल्याचे समजते. अर्थात, प्रदेशाध्यक्ष थोरात व अशोक चव्हाण यांचे काय मत पडते, यावर सारे अवलंबून आहे.

स्वबळावर लढण्याचे स्वप्नही पाहत नाहीतएकेकाळी महापालिका निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने महापालिकेत काँग्रेसची तयारी असे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेस पक्षाने महापालिकेत काम केले आहे. काही वेळा शिवसेना- भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसने विविध समित्यांचे सभापतीपद भूषविले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचे स्वप्नही पाहत नाही, अशी अवस्था झाली आहे. आता तर आघाडीच्या माध्यमातून काही जागा निवडून येतात का, याची चाचपणी पक्षाकडून होत असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटत आहेत.  

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका