शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

इंग्रजी शाळांच्या पायाभूत सुविधा तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:25 PM

जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

औरंगाबाद : जिल्ह्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. अनेक शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा नाहीत. सुरक्षित इमारती नाहीत. सुरत येथील कोचिंग क्लासेसच्या घटनेत अनेक निष्पाप मुलांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सदस्य अविनाश गलांडे यांनी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात तीन-तीन मजली इमारतींमध्ये इंग्रजी शाळा सुरू आहेत. त्यामध्ये मुलांना दाटीवाटीने बसविले जाते. मुलांच्या दृष्टीने शाळांच्या इमारती सुरक्षित आहेत का? शाळेत एखादी दुर्दैवी घटना घडली, तर संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग आहे क ा? मागील काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील सुरत येथे कोचिंग क्लासेसला आग लागली. तेव्हा मुलांनी जीव वाचविण्यासाठी वरच्या मजल्यावरुन उड्या मारल्या. त्या घटनेत अनेक मुलांना जीव गमवावा लागला.

या घटनेनंतर आपल्या जिल्ह्यातील शाळा इमारती सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत का? याची तपासणी शिक्षण विभागाने करण्याची गरज होती. याबाबत मागील बैठकांमध्ये विचारणा करण्यात आली होती.

त्यावर काय कार्यवाही झाली. तेव्हा शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले की, जिल्ह्यात जवळपास १३०० इंग्रजी शाळा आहेत. या शाळांच्या तपासणीबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या. अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर म्हणाल्या की, माझ्या स्वाक्षरीचे पत्र सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले जाईल व शाळा सुरू करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व निकषांची तपासणी केली जाईल.

रमेश गायकवाड यांनी ‘आरटीई’नुसार प्रवेशामध्ये गैरव्यवहार होत आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एक किलोमीटरच्या आत आंतर असलेल्या मुलांना ‘आरटीई’ अंतर्गत शाळेत प्रवेश मिळत नाही आणि शाळेपासून ४-५ किलोमीटर अंतरावर राहणाºया मुलांना प्रवेश मिळतो. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ९२७ जागा रिक्त राहिल्या होत्या. याबाबत पालकांमध्ये असंतोष असून, या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा झाली पाहिजे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण