शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

बायपासचे रुंदीकरण मनपाच्या अजेंड्यावर; नगररचना विभाग लवकरच देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:05 IST

बीड बायपास रोडवरील अपघात सत्रांमुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे.

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अपघात सत्रांमुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे. या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी बुधवारी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली. कनिष्ठ अधिकारी यावर उत्तर देण्यास असमर्थ ठरत असल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्तांनी बायपासचा मुद्दा  अजेंड्यावर आहे. नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी अहवाल तयार करण्याचे काम करीत आहेत. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

नगरसेवक सिद्धांत शिरसाट,  गजानन बारवाल, स्वाती नागरे, शिल्पाराणी वाडकर यांनी मुद्दाा उपस्थित केला. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सी. एम. अभंग यांनी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद केले. विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले की, न्यायालयाने यापूर्वीच आदेश दिले आहेत की, रीतसर भूसंपादन करून रुंदीकरण करावे. उपअभियंता एस. एस. कुलकर्णी यांनी हा विषय उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्याकडे असल्याचे नमूद केले. अधिकाऱ्यांची ही टोलवाटोलवी लक्षात येताच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी माईकचा ताबा घेतला. 

न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका आहेत. अपघात सत्र रोखावे, अशी मागणी एका याचिकेत आहे. दुसऱ्या याचिकेत मालमत्ताधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसला आव्हान देण्यात आले. तत्कालीन आयुक्तांनी सुनावणी घेऊन निकाल दिला नाही. नंतर मी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारीही यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत, असे ते म्हणाले.

सायकलवर केली बायपासची पाहणीच्बायपासवरील अपघात पाहून अस्वस्थ झालेल्या मनपा आयुक्तांनी स्वत: या रस्त्याची सायकलवर जाऊन पाहणी केल्याचे आज बैठकीत नमूद केले. महानुभाव आश्रम ते देवळाई चौकापर्यंत अपघात का होत आहेत, याचे आपण सायकलवरून बारीक निरीक्षण केले.च्अनेक वाहनधारक राँग साईडने ये-जा करतात, त्यामुळे अपघात होत आहेत. नगररचना विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा