शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Aurangabad Violence : अवैैध नळ तोडण्यासाठी मोतीकारंजाच का निवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:10 AM

महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद : शहरात दंगल उसळण्यामागे महापालिकाच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. मोतीकारंजा भागात अवैध नळ कनेक्शन कापण्याच्या कारणावरून दोन गटांत भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान दंगलीत झाल्याचा अंदाज आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना खुलासा करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

शहरात सव्वालाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन तोडावेत, असे आदेश सर्वसाधारण सभेत महापौरांनीच दिले होते. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवीत मनपा अधिका-यांनी प्रारंभी कंटाळा केला. नंतर पोलीस बंदोबस्त मिळवून गुरुवारी मोतीकारंजा भागातील मुख्य जलवाहिनीवरील ४० पेक्षा अधिक नळ कापण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी परत दहापेक्षा अधिक नळ कापले. एका विशिष्ट समाजाचेच नळ कापले; दुस-या समाजाचे नळ का कापण्यात आले नाही, म्हणून वादाला सुरुवात झाली. दोन गटांत भांडण झाले. वादही काही वेळेत मिटला. या घटनेच्या दोन तासांनंतर शहागंज भागात समाजकंटकांनी दंगल घडवून आणली.

शनिवार आणि रविवारी महापालिकेला सुटी असल्याने सोमवारी सकाळीच महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोतीकारंजा का निवडण्यात आला, असा प्रश्न करण्यात आला. चहेल यांनी उत्तर दिले की, या भागातील काही नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. लोकशाही दिनातही तक्रारी होत्या, म्हणून या भागात कारवाई केली. हे उत्तर समाधानकारक नसल्याने लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार