शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दंगेखोरांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाही; औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार्‍यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:34 PM

विशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्‍यांना विचारला.

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्‍यांना विचारला.१२ जानेवारीपर्यंत रजा मंजूर असताना शहरात दंगल पेटल्याचे कळताच पोलीस आयुक्त ४ जानेवारी रोजी सिंगापूर येथून औरंगाबादेत परतले

औरंगाबाद : विशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्‍यांना विचारला. १२ जानेवारीपर्यंत रजा मंजूर असताना शहरात दंगल पेटल्याचे कळताच पोलीस आयुक्त ४ जानेवारी रोजी सिंगापूर येथून औरंगाबादेत परतले आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. 

बुधवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त यादव म्हणाले की, पोलिसांना देण्यात आलेल्या प्लास्टिक गोळ्या (बुलेट) दंगलखोरांच्या कमरेखाली लागाव्यात असा मारा करण्याच्या सूचना असतात. प्लास्टिक गोळ्या  लागल्यामुळे कोणीही मृत्युमुखी पडत नाही, मात्र तीन ते चार दिवस त्यांना त्याचा त्रास होतो आणि कोणीही दंगा करण्याचे धाडस करीत नाही. १ जानेवारी रोजी रात्री आपण औरंगाबादेतून रजेवर गेलो तेव्हा शहरात एक जमाव जमला होता आणि पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले होते. दुसर्‍या दिवशी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि ठिकठिकाणी दगडफेक आणि वाहने जाळण्याचे प्रकार होण्यास सुरुवात झाली. तीन दिवस शहरात ही दंगल सुरू होती. याविषयी माहिती मिळताच आपण रजा अर्धवट सोडून औरंगाबादेत परतलो; मात्र तीन दिवसांत शहरात शांतता प्रस्थापित करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले होते. 

दोन दिवसांपासून शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दंगलीच्या काळात पोलिसांवर दगडफेक करणार्‍यांविरोधात लाठीहल्ला, अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यासोबतच पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांच्या हवेत ५३ फैरी झाडल्या. हवेत गोळीबार केल्याने त्याचा परिणाम दंगलखोरांवर होत नाही. उलट दंगलखोरांच्या कमरेखाली प्लास्टिक गोळ्या झाडल्यास त्यांना दुखापत होते; मात्र मृत्यू होत नाही आणि मात्र कायमचा त्यांना जरब बसतो.

दंगाकाबू नियंत्रण पथकाची स्थापनादरम्यान, शहरात उद्भवणार्‍या अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी दंगा नियंत्रण पोलीस पथक (आर.सी.पी.) स्थापन करण्यात आले. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे या पथकाच्या प्रमुख आहेत. या पथकात ४० जवान असतील. दंगेखोरांना कमरेखाली प्लास्टिक गोळ्या कशा माराव्यात, याबाबतचे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद