शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंडेंच्या पाठीशी उभे राहताना देशमुख यांच्या बाजूकडे दुर्लक्ष का? मनोज जरांगे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 19:15 IST

मनोज जरांगे पाटील यांचा महंत नामदेव शास्त्री यांना थेट सवाल

छत्रपती संभाजीनगर: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याबद्दल आपले वैयक्तिक मत असल्याचे पुन्हा नमूद केले आहे. संत, महंतांना वैयक्तिक आयुष्य नसते तर ते सामुदायिक असतात. यामुळे त्यांचे मतही सामुदायिक ठरते. धनंजय मुंडेच्या पाठिशी उभे राहताना मृत देशमुख यांच्या कुटुंबाची दुसऱ्या बाजूचा विचार का झाला नाही, असा सवाल मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी पाच दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे हे ३० जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गुंडांच्या टोळ्या पाळणे, त्यांना खंडणी वसूल करायला लावणे, खून करायला लावणे हे पाप झाकण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर रात्रभर मुक्कामी गेले होते. दुसऱ्या दिवशी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांनी मागील ५३ दिवसांत खूप सोसल्याचे आणि आपण त्यांच्या पाठिशी असल्याचे पत्रकारांना सांगितले. मुंडे यांच्या हाताला असलेल्या सलाईनच्या इंजेक्शनमधून रक्त दिसल्याचे महंत म्हणाले. परंतु ही एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूचा विचार न करता गुन्हेगाराला साथ देणाऱ्याची पाठराखण महतांने करणे योग्य नसल्याचे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मंत्री धनंजय मुंडे यांनी वाईट पायंडे पाडत  खूनशीपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीने संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आपल्याविरोधात गुन्हे नोंदवायला लावले, प्रतिमोर्चे काढले.  आता परिसिमा गाठून संप्रदायाला यात ओढल्याची टीका जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण