शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

कोरोनामुक्त गावांतील शाळा बंद का ? गावकरी, शिक्षक, तज्ज्ञांनी केली सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 19:36 IST

गावकरीही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेत असताना मुलांची शाळा बंद ठेवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय जरा शिथिल करायला पाहिजे.

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दिलेल्या नव्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी रविवारी दिले. त्यावर पालकांसह शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शाळेचा निर्णय गावपातळीवर घेऊ द्या, अशी मागणी कोरोनामुक्त गावांतून होत आहे.

सोयगाव तालुक्यातील निंबायतीचे सरपंच विशाल गिरी म्हणाले, मुख्य रस्त्यापासून २ किलोमीटर आतमध्ये माझे ५ तांड्यांचे गाव आहे. बसही न येणाऱ्या पाचही तांड्यांवर शाळा आहे. १०० टक्के लसीकरण झालेले असून, गावात एकही कोरोना बाधित नाही. गावकरीही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेत असताना मुलांची शाळा बंद ठेवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय जरा शिथिल करायला पाहिजे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा मिळावी.

बहुतांश मुलांच्या पालकांकडे मोबाइल नाही. अनेकांकडे साधे फिचर फोन असून, ॲन्ड्रॉइड फोन नाहीत. मुलांचा अध्ययनस्तर खालावला आहे. हे नुकसान कसे भरून काढणार, याचाही विचार व्हायला पाहिजे. असे शिक्षक कैलास गायकवाड म्हणाले. सोमवारी पहिल्या दिवशी २० टक्क्यांपेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासला प्रतिसाद दिल्याचे शिक्षकांनी ‘लाेकमत’ला सांगितले. ऑनलाईनची साधने नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होईपर्यंत शैक्षणिक नुकसानच होईल, असे शिक्षक संघाचे राजेश हिवाळे म्हणाले.

सरसकट शाळा बंदचा निर्णय दुर्दैवीविद्यार्थी शाळेत स्थिरावले असताना हा निर्णय दुर्दैवी आहे. गावपातळीवर पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत, शालेय समिती, शाळा यांना निर्णयाचा अधिकार द्यायला हवा. एकीकडे दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात, तर दुसरीकडे ऑनलाईनच्या शिक्षणाबाबत चिंता वाटते.- अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, गणोरी

ऑनलाईन शिक्षणाला मर्यादाजिल्हा परिषदेच्या निम्म्या शाळा या द्विशिक्षकी शाळा व ५० पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. या शाळेत शारीरिक अंतर राखण्याचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. ग्रामीण भागातील मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाला खूप मर्यादा, अडचणी आहेत. ज्या गावात रुग्ण नाही, त्या गावात शाळा सुरू ठेवायला हवी. दोन वर्षांपासून मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवतो आहोत.-डाॅ. रूपेश मोरे, शिक्षणतज्ज्ञ, औरंगाबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीSchoolशाळा