शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

महापोर्टलमध्ये कोणाची भागीदारी, भ्रष्टाचारात कोणाकोणाला जातो वाटा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:00 IST

सरकारने बेरोजगार युवकांची चेष्टा केली.

ठळक मुद्देदिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

औरंगाबाद : महापोर्टलद्वारे नोकर भरतीमध्ये घोटाळ्याचे प्रकार होत असूनही सरकारचा याद्वारे भरती करण्याच्या अट्टहास का. यातील भ्रष्टाचाराच्या वाटण्या कोणाकोणापर्यंत जातात. यात भागीदारी कोणाची आहे हे जाहीर करा असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. तसेच महापोर्टल बंद करून सर्व भरती एमपीएससीद्वारे सुरु करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ते क्रांती चौक येथील शेतकरी आक्रोश मोर्चात बोलत होते.

मेगा पोलीस भरती झाली पाहिजे, महापोर्टल ऑनलाईन परीक्षा रद्द झाली पाहिजे, महापोर्टल बंद करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे  सोमवारी क्रांती चौक येथून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, राज्यात पोलिसांची हजारो पदे रिक्त असूनही सरकार कमी प्रमाणात भरती करत आहे. काही जिल्ह्यात एक, दोन तर काही जिल्ह्यात काहीच पदांची भरती नाही अशा प्रकारे सरकारने बेरोजगार युवकांची चेष्टाच केली आहे. हजारो पदे रिक्त असताना सरकार मेगा भरती का काढत नाही असा सवाल शेट्टी यांनी केला. तसेच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने पिडीत आहे  तर काही भागात आलेल्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. या अस्मानी संकटावर दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याची खरमरीत टीकाही यावेळी शेट्टी यांनी केली. 

दादागिरी सहन केली जाणार नाही नुसत्या घोषणा देऊन मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा प्रश्न दुसरीकडे वळवत आहेत. तसेच शेतकरी, बेरोजगारी यावर जो प्रश्न विचारतो त्याचा आवाज दडपण्यात येतो. युवती आघाडीच्या प्रदेक्षाध्यक्ष पूजा मोरे यांना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली ती लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांना संताप देणारी आहे. अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMorchaमोर्चाState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीStudentविद्यार्थी