शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

‘धनुष्यबाण’ व पक्ष अधिकृतपणे कोणाचा? जाणून घ्या ज्येष्ठ विधिज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:33 IST

बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार आहेत.

औरंगाबाद : धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्ष अधिकृतपणे कोणाकडे राहील, याबाबत राष्ट्रीय निवडणूक आयोगच १९६८ च्या निवडणूक चिन्ह अधिनियमानुसार निर्णय घेऊ शकतो, असे कायदेशीर मत उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले.

बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार आहेत. त्यामुळे ते ‘धनुष्यबाणा’सह संपूर्ण शिवसेनाच कायदेशीरपणे ताब्यात घेऊ शकतात, अशी चिन्हे आहेत. विद्यमान परिस्थितीत कायदा काय म्हणतो, याबाबत ‘लोकमत’ने वकिलांकडून प्रतिक्रिया घेतल्या.

निवडणूक चिन्ह गोठवले सुद्धा जाऊ शकतेजर दोन गट एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्ष किंवा त्याच्या चिन्हावर दावा सांगत असतील तर त्यावर निवडणूक चिन्ह नियम १९६८ च्या नियम १५ अन्वये निर्णय घेण्याचे अधिकार भारत निर्वाचन आयोगाचे आहेत. संबंधितांची सुनावणी घेऊन भारत निर्वाचन आयोग एक तर एखाद्या गटाचा दावा मान्य करते किंवा निवडणूक चिन्ह गोठवूसुद्धा शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा अथवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा नेता प्राप्त राजकीय पक्ष अथवा पक्षाचे चिन्ह यासंदर्भातील वाद आता भारत निर्वाचन आयोगच सोडवू शकते.-ॲड. देवदत्त पी. पालोदकर

चिन्ह ताब्यात घेऊ शकतात ‘धनुष्यबाणा’सह संपूर्ण शिवसेनाच कायदेशीरपणे ताब्यात घेऊ शकतात, असा दावा कोणी करीत असेल तर त्यांना निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. आयोग दोन्ही गटांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन योग्य तो निर्णय घेईल. शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जादा आमदार असल्यामुळे त्यांना पक्षांतर बंदीचे भय उरलेले नाही. त्यांनी पक्ष सोडलेला नाही. केवळ त्यांचा बंडखोर गट आहे.- ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख

ज्यांच्या नावे नोंदणी, त्यांचा पक्ष शिवसेना हा राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे पक्षाची ज्यांच्या नावे नोंदणी झाली असेल, त्यांच्याकडेच तो पक्ष राहील. बंडखोर विधानसभेत वरीलप्रमाणे दावा करू शकतात. मात्र, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता कमी आहे.-ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ

विधानसभेच्या सभापतींचा निर्णय महत्वाचाबंडखोर गटाला सर्वप्रथम विधानसभेच्या सभापतींकडे अर्ज करून ‘गट मान्यता’ मिळण्याची मागणी करावी लागेल. सभापती गटातील आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची खात्री करून गट म्हणून मान्यता देतात. सभापतींच्या निर्णयाचा संदर्भ देत निवडणूक आयोगच चिन्ह व पक्ष कोणाकडे राहील, याचा निर्णय घेऊ शकतात.-ॲड. बी.एल. सगर किल्लारीकर

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ