शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

By सुमित डोळे | Published: November 29, 2023 4:32 PM

हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा निघणार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या ३ वर्षांपासून पोलिस भरती रखडली. भरतीबाबत सरकारच्या घोषणेकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आस लावून आहेत. मध्यंतरी प्रशासनाकडून दोन वर्षे कमाल वयोमर्यादा देखील वाढवली गेली; परंतु त्या निर्णयानुसार डिसेंबरआधी पोलिस भरतीसाठी अर्ज घेतले नाही तर लाखो उमेदवार या भरतीपासून वंचित राहण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी महिन्याभरात ४० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचे उंबरे झिजविले; मात्र तरीही शासनाला फरक पडत नसल्याने तरुणांमधून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

२०१९ मध्ये पोलिस भरतीची घोषणा झाली आणि कोराेनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. ती रखडलेली भरती २०२१ मध्ये पार पडली. त्यानंतर पोलिस दलात १८ हजार पदांसाठी भरती सुरू केल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्याने पोलिस भरतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. मात्र, त्यानंतर पोलिस भरतीबाबत अधिक संभ्रम पसरला.

२०२१ नंतर गत दोन वर्षांची भरतीबाबत अद्याप शासनाकडून कुठलीच हालचाल नाही. सामान्य प्रशासन विभागातर्फे मार्चमध्ये दोन वर्षे कमाल वयाेमर्यादा वाढवून देण्यात आली. त्यानुसार ३१ डिसेंबर, २०२३ च्या पूर्वी पोलिस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घेणे अपेक्षित आहे. नसता लाखो उमेदवार पोलिस भरतीपासून वंचित राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. महिनाभरापासून राज्यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना भेटून हे निवेदन देत आहोत; परंतु अद्यापही काहीच ठोस निर्णय नाही, असे पोलिस भरतीची तयारी करणारा महेश भोसलेने सांगितले. तर माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही स्वप्न पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे, असे निराशपणे अभिजित म्हस्के याने सांगितले.

नागपूरमध्ये रोष दिसणारराज्यातून पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी एकवटत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात १५ डिसेंबर रोजी हजारोंच्या संख्येने नागपूरमध्ये जमा होऊन मागणी लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी झालेली भरतीवर्ष भरती संख्या२०१६ - ४३००२०१७ -१७१७२०१८ - ३२८७२०१९ - ३३५७ (२०२१ मध्ये पार पडली)२०२१ -१८, ३३१ (२०२२ मध्ये पार पडली)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसEducationशिक्षणSandipan Bhumreसंदीपान भुमरे