शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

पाणी मुरते कुठे ? नाथसागरात आले अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 6:54 PM

जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे. नाथसागरात मंगळवारी अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी दाखल झाले. त्यामुळे ‘जायकवाडी’च्या हक्काचे पाणी कुठे मुरते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून आलेल्या पाण्याचा सहाव्या दिवशी सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग झाला. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग होता. यात निळवंडेचा विसर्ग मंगळवारी २०५० इतका झाला आणि ओझर बंधाऱ्यातील विसर्ग १८९५ क्युसेकपर्यंत वाढला. त्यामुळे मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्गही वाढला. मधमेश्वर बंधाऱ्यातून सोमवारी ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. यात ८२७ क्युसेकपर्यंत वाढ झाली. 

निळवंडेबरोबर दारणा प्रकल्पाखालील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले होते. निळवंडेतून पाण्याचा विसर्ग होत असतानाच अनेक दिवसांनंतर दारणा प्रकल्पाच्या खालील बंधाऱ्यात रोखलेले पाणी सोडले; परंतु तरीही पाण्याची  आवक होत नाही. जायकवाडीत बुधवारपर्यंत आणखी पाणी दाखल होईल, असे ‘कडा’तर्फे सांगण्यात आले. जायकवाडीत सोमवारी २९.१३ टक्के पाणीसाठा होता.  मंगळवारी साठा २८.९३ टक्क्यांवर आला.

दारणाखाली अडवलेले पाणीदारणा धरणातून सोडण्यात आलेले पाणी खाली कोल्हापूर बंधाऱ्यांत अडविण्यात आले होते. बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आल्याने हे पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. २.७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद