शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जिथे पक्षाची ताकद तिथेच मतदान कमी; पदवीधर मतदारसंघातील पराभवाची भाजपाकडून कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:50 IST

BJP Defeat जबाबदार नेतेच बोराळकरांच्या पराभवास कारणीभूत

ठळक मुद्दे पक्ष निरीक्षक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोर वाचला पाढा 

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियातून काहींनी जातीवाचक प्रचार करून ही निवडणूक वादात अडकवली. परिणामी एवढी मोठी ताकद असतानाही भाजप उमेदवाराचा दारुण पराभव झाला. काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सुपारी घेतल्याप्रमाणे पराभव होण्यासाठीच कामे केल्याची भावना पक्ष निरीक्षक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर नेते, पदाधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केली.औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी बावनकुळे शहरात आले आहेत. शहरातील जालना रोडवरील एका हाॅटेलमध्ये बावनकुळे यांनी मॅरेथॉन बैठक घेतली. उमेदवारासह सर्व प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा केली. पराभूत उमेदवार बोराळकर यांनी सर्वांत शेवटी पराभवाची कारणे त्यांना सांगितली.

भाजपाची विभागात ताकद असताना पराभव झालाच कसा, यासंदर्भात बैठकीत मंथन झाले. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली; परंतु नेत्यांनी काय केले, कोण कुठे कमी पडले याची माहिती बावनकुळे यांनी घेतली. पक्षाला दोन ते तीन जिल्ह्यांतून मोठा फटका बसला आहे. संघटनेत सुशिक्षित पदाधिकाऱ्यांची फौज असताना पराभव झाला. मतदान कमी का पडले, जातीवादावर निवडणूक नेण्यासाठी सोशल मीडियातून कुणी व कसा प्रचार केला, या सगळ्या बाबींची ग्रामीण आणि शहरी पदाधिकाऱ्यांकडून बावनकुळे यांनी माहिती घेतली. यासंदर्भात बावनकुळे यांन विचारले असता त्यांनी सांगितले की, विभागात जिल्हानिहाय पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेतली. याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. निवडणुकीच्या काळात मराठा, ब्राम्हण, ओबीसी अशा पध्दतीने पक्ष उमेदवाराविरोधात तेढ निर्माण केली. सोशल मीडियातून वातावरण खराब केले. त्याला कुणीही थोपविले नाही. पक्षनेतृत्वातील काही जणांच्या आवाक्यात परिस्थिती असताना त्यांनी कुणाला समज दिली नाही. केवळ माजी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच सर्व काही केल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्याकडे व्यक्त केली.

जिथे पक्षाची ताकद तिथेच मतदान कमीबीड जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद असताना तेथून मतदान कमी झाले, अशी माहिती बैठकीत चर्चेला आली. बीड जिल्ह्यात ४५ हजार मतदान झाले. त्यापैकी ३० हजार मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गेले. उरलेल्या १५ हजारांत भाजपासह सर्व उमेदवार राहिले. यातून लक्षात येते की, कुणी कुणाचे काम केले. आमदार, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री असताना भाजपाचा दारूण पराभव झाल्याचे मत उमेदवारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्यासमोर मांडल्याचे भाजपा गोटातून सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाElectionनिवडणूकSatish Chavanसतीश चव्हाण