शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जिथे पक्षाची ताकद तिथेच मतदान कमी; पदवीधर मतदारसंघातील पराभवाची भाजपाकडून कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:50 IST

BJP Defeat जबाबदार नेतेच बोराळकरांच्या पराभवास कारणीभूत

ठळक मुद्दे पक्ष निरीक्षक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोर वाचला पाढा 

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियातून काहींनी जातीवाचक प्रचार करून ही निवडणूक वादात अडकवली. परिणामी एवढी मोठी ताकद असतानाही भाजप उमेदवाराचा दारुण पराभव झाला. काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सुपारी घेतल्याप्रमाणे पराभव होण्यासाठीच कामे केल्याची भावना पक्ष निरीक्षक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर नेते, पदाधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केली.औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी बावनकुळे शहरात आले आहेत. शहरातील जालना रोडवरील एका हाॅटेलमध्ये बावनकुळे यांनी मॅरेथॉन बैठक घेतली. उमेदवारासह सर्व प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा केली. पराभूत उमेदवार बोराळकर यांनी सर्वांत शेवटी पराभवाची कारणे त्यांना सांगितली.

भाजपाची विभागात ताकद असताना पराभव झालाच कसा, यासंदर्भात बैठकीत मंथन झाले. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली; परंतु नेत्यांनी काय केले, कोण कुठे कमी पडले याची माहिती बावनकुळे यांनी घेतली. पक्षाला दोन ते तीन जिल्ह्यांतून मोठा फटका बसला आहे. संघटनेत सुशिक्षित पदाधिकाऱ्यांची फौज असताना पराभव झाला. मतदान कमी का पडले, जातीवादावर निवडणूक नेण्यासाठी सोशल मीडियातून कुणी व कसा प्रचार केला, या सगळ्या बाबींची ग्रामीण आणि शहरी पदाधिकाऱ्यांकडून बावनकुळे यांनी माहिती घेतली. यासंदर्भात बावनकुळे यांन विचारले असता त्यांनी सांगितले की, विभागात जिल्हानिहाय पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेतली. याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. निवडणुकीच्या काळात मराठा, ब्राम्हण, ओबीसी अशा पध्दतीने पक्ष उमेदवाराविरोधात तेढ निर्माण केली. सोशल मीडियातून वातावरण खराब केले. त्याला कुणीही थोपविले नाही. पक्षनेतृत्वातील काही जणांच्या आवाक्यात परिस्थिती असताना त्यांनी कुणाला समज दिली नाही. केवळ माजी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच सर्व काही केल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्याकडे व्यक्त केली.

जिथे पक्षाची ताकद तिथेच मतदान कमीबीड जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद असताना तेथून मतदान कमी झाले, अशी माहिती बैठकीत चर्चेला आली. बीड जिल्ह्यात ४५ हजार मतदान झाले. त्यापैकी ३० हजार मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गेले. उरलेल्या १५ हजारांत भाजपासह सर्व उमेदवार राहिले. यातून लक्षात येते की, कुणी कुणाचे काम केले. आमदार, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री असताना भाजपाचा दारूण पराभव झाल्याचे मत उमेदवारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्यासमोर मांडल्याचे भाजपा गोटातून सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाElectionनिवडणूकSatish Chavanसतीश चव्हाण