शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पाणी कुठं मुरतंय! अधिवेशनापूर्वीच ३०० कोटींच्या टँकर घोटाळ्याची चौकशी स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:11 IST

विधानसभेच्या मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश शासनाने दिले होते.

औरंगाबाद : मराठवाड्यात चार वर्षांत विभागात पर्जन्यमान सरासरी एक हजार मिलीमीटरच्या पुढे गेले असतानाही टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर विभागात कोट्यवधींचा खर्च झाला. यात २०१८ ते २०२२ या काळात अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपये रक्कम खर्च करण्यात आली. या खर्चावर संशय व्यक्त करीत बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अधिवेशनापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीला शासनाने स्थगिती दिल्याने संशय वाढला आहे. विभागीय आयुक्तालयाला स्थगिती आदेश प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आदेशामुळे चौकशीसाठी नियुक्त केलेल्या ४०० अधिकाऱ्यांच्या तालुकानिहाय चौकशी समित्याही स्थगित झाल्याचे मानले जात आहे. विधानसभेच्या मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश शासनाने दिले होते. शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माहिती संकलनासाठी सुमारे ४०० अधिकाऱ्यांची तालुकानिहाय नियुक्ती केली. लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, महसूल कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन टँकर कसे लावले, सुरू कधी केले, किती फेऱ्या झाल्या, याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करणार होते.

४०० अधिकाऱ्यांच्या समित्यांना स्थगितीविभागात टँकर पाणीपुरवठ्यात घोटाळा झाल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पूर्ण विभागात चौकशी करावी, असे आदेश शासनाने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यासाठी लेखाधिकारी यांच्यासह चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. यात ४०० अधिकाऱ्यांचा समावेश होता. काही लेखाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास नकार दर्शविला होता. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. दरम्यान, आता शासनानेच ही चौकशी स्थगित करण्याचा आदेश दिल्यामुळे सगळे काही थांबले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणीfraudधोकेबाजी