शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जायकवाडीत पाणी पोहोचणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:58 IST

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले आहे.

ठळक मुद्देअवघ्या मराठवाड्याचे लक्ष : नगर, नाशिकमध्ये विरोध, मराठवाड्यात मात्र सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एका बैठकीनंतर शांत

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले आहे. परिणामी, जायकवाडीत हक्काचे पाणी कधी पोहोचणार, याकडे अवघ्या मराठवाड्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.जायकवाडी धरणासाठी दारणा, गंगापूर व पालखेड धरण समूहातील धरणांतून २६ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आंदोलनामुळे आता नाशिक जिल्ह्यातील तीनही धरण समूहातून सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले जाणार आहे. नगरमध्येही पाणी सोडण्यासाठी विरोध होत आहे. मुळा धरणातून शनिवारी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही, अशी माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात १५ आॅक्टोबर रोजी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीच्या सात दिवसांनंतर २३ आॅक्टोबर रोजी ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी, असे म्हटले होते. त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी होण्याची गरज होती. परंतु पाणी सोडण्यासाठी पूर्वतयारी आणि नंतर आंदोलनामुळे उशीर होत असल्याचे कारण नगर, नाशिक जिल्ह्यांतील पाटबंधारे विभागाचे अधिकारी पुढे करीत आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील अधिकारीही पाणी सोडण्याच्या विरोधात असल्याची ओरड होत आहे. पाणी प्रश्न पेटणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी जायकवाडीत कधी पाणी येणार, याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असणाºयांवर कारवाईची मागणी मराठवाड्यातून पुढे येत आहे.मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कुठे?नगर, नाशिकमध्ये पाणी अडविण्यासाठी आंदोलने उभी राहिली. परंतु मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी २२ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत झालेल्या समन्यायी पाणीवाटप परिषदेत मनोगत व्यक्त करून शांत बसले आहेत. या परिषदेनंतर आदेश निघाले, मात्र पाणी जायकवाडीत पोहोचेल, यासाठी कोणतीही भूमिका सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून घेतली जात नसल्यामुळे नाराजीचा सूर मराठवाड्यातून व्यक्त होत आहे.आदेशाचे अनुपालन नाही तर शिक्षामहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिक रण कायद्यातील क लम क्रमांक २६ या अधिनियमाखालील आदेशाचे अनुपालन न केल्यास कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यास होत असलेल्या विलंबासाठी संबंधित अधिकाºयांवर कारवाई होऊ शकते. आदेशाचे अनुपालन न केल्याबद्दल अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी गत आठवड्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केलेली आहे.निळवंडेतून आज सोडणार पाणीभंडारदरा धरणातून २५ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे पाणी प्रथम निळवंडे धरणात जमा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार निळवंडेतून जायकवाडीसाठी रविवारी पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण