शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

अनुकंपाधारकांच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 19:07 IST

भरतीकडे डोळे लावून बसलेले अनुकंपाधारक वयाची मर्यादा ओलांडत आहेत. 

-विजय सरवदे 

शासकीय सेवेत कार्यरत असताना कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपातत्त्वावर सेवेत सामावून घेण्याची योजना आहे. एकूण रिक्त जागांच्या १० टक्के अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले जाते. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत कित्येक वर्षांपासून अशी भरती झालेलीच नाही. अशीच अवस्था अन्य शासकीय कार्यालयांमधील अनुकंपाधारकांची आहे. दिवसेंदिवस प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे भरतीकडे डोळे लावून बसलेले अनुकंपाधारक वयाची मर्यादा ओलांडत आहेत. 

वास्तविक पाहता अधिकाऱ्यांनी मनात आणले तर अनुकंपातत्त्वानुसार यापूर्वीच भरती झाली असती; पण प्रत्येक वेळी काही तरी कारण काढून भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येते. डिसेंबर २०१५ मध्ये अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षा यादीतील अवघ्या ९ जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत भरतीच झालेली नाही. दरवर्षी केवळ प्रतीक्षा यादीच अद्ययावत केली जाते. सध्या जि. प. सामान्य प्रशासन विभागाने १९२ अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी तयार केलेली आहे, असे असले तरी शासकीय धोरणानुसार प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार अवघ्या ३० ते ३५ जणांनाच नोकरीत सामावून घेतले जाऊ शकते. 

मागील डिसेंबर महिन्यात अनुकंपाधारकांंना ज्येष्ठता यादीनुसार सेवेत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याही महिन्यात भरती झाली नाही. या वर्षाच्या मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यानंतर सध्या विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. औरंगाबादशेजारील अहमदनगर जिल्हा परिषदेने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठताच अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार दिला. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. औरंगाबाद जिल्हा परिषददेखील असे करूशकली असती; पण त्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वृत्ती असावी लागते. 

घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे संसार उघड्यावर पडला आहे. अनुकंपातत्त्वानुसार नोकरीची आशा असताना प्रशासन सातत्याने उमेदवारांची निराशाच करीत आहे. अनेक कुटुंबांना अक्षरश: उपासमारीचा सामना करावा लागत आहे. प्रतीक्षा यादीवर अनुकंपाधारक वयोमर्यादा ओलांडून बाद होण्याच्या सीमारेषेवर आले आहेत, तर अनेकजण यातून बादही झाले आहेत. मागील काही दिवसांपासून अस्वस्थ अनुकंपाधारकांनी सेवेत सामावून घ्यावे म्हणून जि.प. प्रशासनाला उपोषणाचा इशाराही दिला होता. तेव्हा लवकरच भरती केली जाईल, असे आश्वासन देऊन प्रशासनाने त्यांची बोळवण केली. अनुकंपाधारकांची ‘गल्ली ते दिल्ली’ स्थिती सारखीच आहे. अनुकंपाधारकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अनुकंपाधारक संघाने मुंबईत उपोषण करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न बराच गाजला; पण नंतर ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच या भरतीची स्थिती झाली. कुटुंबाचा गाडा हाकताना अनुकंपाधारक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते; परंतु त्यावरही मात करताना त्यांच्या मनात केवळ एकच आशा असते ‘आज नाही, तर उद्या नोकरीची संधी मिळेल’ व कुटुंबाची होणारी वाताहत थांबेल. मात्र, वर्षामागून वर्षे चालली तरी अनुकंपा भरतीबाबत प्रशासन हालत नाही. प्रशासनातील वरिष्ठांना तरी पाझर फुटावा व अनुकंपाधारकांचा रखडलेला हा प्रश्न मार्गी लावावा. तूर्त एवढेच!

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी