शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:04 IST

अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मराठवाड्यातील तब्बल ७५ हजार  शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोडणीसाठी आॅनलाईन नोंदणी केली खरी; परंतु अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. हजारो शेतकऱ्यांचे किरकोळ कारणामुळे अर्ज नाकारले जातात, तर ज्यांचे अर्ज वैध झालेले आहेत, त्यांना कोटेशन दिले जात नाही. परिणामी, सलग तीन वर्षांपासून वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या अशा ढिसाळ कारभाराबद्दल असंतोष पसरला आहे. 

शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अस्तित्वात आली. या योजनेचे आॅक्टोबर २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनही केले. मात्र, आजपर्यंत ही योजना प्रत्यक्षात शेतापर्यंत पोहोचलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीजजोडणीचे पैसे भरलेले आहेत; पण त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल ७५ हजार शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत वीजजोडणीसाठी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी किरकोळ कारणास्तव २१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, अवघ्या १३ हजार शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले. यापैकी  ७३२५ शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी महावितरणकडे पैसेही भरले. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करीत प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी ‘एचडीव्हीएस’ योजनेंतर्गत वीजजोडणी देण्याचे महावितरणने सांगितले; परंतु या योजनेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ही योजना वर्षभर रखडली.

पुढे या योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू झाले. तेव्हा विद्युत वाहिनीपासून ६०० मीटर परिघातील दोन किंवा तीन शेतकऱ्यांना एका ट्रान्सफॉर्मरवरून वीज देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, काही शेतकऱ्यांच्या बांधापासून काही ठिकाणी १ किंवा २ किलोमीटर अंतरावर ‘एचडीव्हीएस’ची विद्युत वाहिनी असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना ‘एचडीव्हीएस’ ऐवजी सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोडणी देण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सौर कृषिपंपासाठी अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता कोटेशन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तर आचारसंहितेच्या नावाखाली ते बोलण्यास टाळत आहेत.

केवळ वीजजोडणीअभावी जळताहेत बागा‘लोकमत’कडे यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात आडूळ येथील शेतकरी अशोक वाघ यांनी सांगितलेली व्यथा अशी, वीजजोडणीसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ‘एचडीव्हीएस’ योजनेत वीजजोडणी दिली जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ४त्यानंतर सांगितले की, तुम्ही सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करा. आम्ही आॅनलाईन अर्ज केले. कोटेशन मागण्यासाठी गेलो, तर आता अधिकारी म्हणतात, तुम्हाला आपोआप सौर कृषिपंपाची जोडणी मिळेल. आजपर्यंत आम्हाला ना ‘एचडीव्हीएस’ योजनेतून कनेक्शन मिळाले, ना सौर कृषिपंप योजनेतून. आमच्या हातातोंडाला आलेल्या आंबे, मोसंबीच्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती