शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:04 IST

अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : मराठवाड्यातील तब्बल ७५ हजार  शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोडणीसाठी आॅनलाईन नोंदणी केली खरी; परंतु अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. हजारो शेतकऱ्यांचे किरकोळ कारणामुळे अर्ज नाकारले जातात, तर ज्यांचे अर्ज वैध झालेले आहेत, त्यांना कोटेशन दिले जात नाही. परिणामी, सलग तीन वर्षांपासून वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या अशा ढिसाळ कारभाराबद्दल असंतोष पसरला आहे. 

शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अस्तित्वात आली. या योजनेचे आॅक्टोबर २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनही केले. मात्र, आजपर्यंत ही योजना प्रत्यक्षात शेतापर्यंत पोहोचलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीजजोडणीचे पैसे भरलेले आहेत; पण त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल ७५ हजार शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत वीजजोडणीसाठी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी किरकोळ कारणास्तव २१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, अवघ्या १३ हजार शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले. यापैकी  ७३२५ शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी महावितरणकडे पैसेही भरले. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करीत प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी ‘एचडीव्हीएस’ योजनेंतर्गत वीजजोडणी देण्याचे महावितरणने सांगितले; परंतु या योजनेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ही योजना वर्षभर रखडली.

पुढे या योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू झाले. तेव्हा विद्युत वाहिनीपासून ६०० मीटर परिघातील दोन किंवा तीन शेतकऱ्यांना एका ट्रान्सफॉर्मरवरून वीज देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, काही शेतकऱ्यांच्या बांधापासून काही ठिकाणी १ किंवा २ किलोमीटर अंतरावर ‘एचडीव्हीएस’ची विद्युत वाहिनी असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना ‘एचडीव्हीएस’ ऐवजी सौर कृषिपंप योजनेंतर्गत वीजजोडणी देण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार सौर कृषिपंपासाठी अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता कोटेशन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तर आचारसंहितेच्या नावाखाली ते बोलण्यास टाळत आहेत.

केवळ वीजजोडणीअभावी जळताहेत बागा‘लोकमत’कडे यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात आडूळ येथील शेतकरी अशोक वाघ यांनी सांगितलेली व्यथा अशी, वीजजोडणीसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ‘एचडीव्हीएस’ योजनेत वीजजोडणी दिली जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ४त्यानंतर सांगितले की, तुम्ही सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करा. आम्ही आॅनलाईन अर्ज केले. कोटेशन मागण्यासाठी गेलो, तर आता अधिकारी म्हणतात, तुम्हाला आपोआप सौर कृषिपंपाची जोडणी मिळेल. आजपर्यंत आम्हाला ना ‘एचडीव्हीएस’ योजनेतून कनेक्शन मिळाले, ना सौर कृषिपंप योजनेतून. आमच्या हातातोंडाला आलेल्या आंबे, मोसंबीच्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती