शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा?

By विकास राऊत | Published: April 23, 2024 1:09 PM

१३ मे रोजी होणार मतदान: कडक उन्हाळ्यात होईल सर्व प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. कडक उन्हाळ्यात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडतो आहे. उमेदवारांसाठी नेत्यांच्या सभांची मांदियाळी सर्वत्र दिसत असून, पहिल्या टप्प्यात मतदानही झाले आहे. सात टप्प्यात देशभर मतदान होणार असून ते सर्व उन्हाळ्यात होणार आहे. १३ मे रोजी कडक उन्हाळ्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे पहिल्या टप्प्यातील आकड्यांवरून दिसते आहे. ऋतू, तापमान की मतदारांमध्ये असलेला निरुत्साह, याचा परिणाम होतो की नाही, याचा आजवरच्या निवडणुकींचा आलेख पाहिला तर काय लक्षात येते पाहू.

हिवाळ्यात झाले मतदान१९५२ ते १९६७ या चार निवडणुका, १९८० ते १९८९ या काळातील निवडणुका ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात म्हणजे हिवाळ्यामध्ये निवडणुकांसाठी मतदान झाले. ८ निवडणुकांसाठी उन्हाळ्यात मतदान झाले आहे.

वर्ष ............ महिना.............. कोणत्या ऋतूत निवडणुका ...................             मतदान (टक्के)१९७२...... मार्च.....................उन्हाळा ...........................५२.६६१९७७..... मार्च .......... ........उन्हाळा ............................५६.१७१९८०.....जानेवारी...............हिवाळा .............................४५.०८१९८४......डिसेंबर ...............हिवाळा ............................५८.७८१९८९.....नोव्हेंबर ..............हिवाळा ..............................५९.९४१९९१....मे ....................उन्हाळा ...............................४८.६७१९९६......एप्रिल............उन्हाळा ................................५२.८९१९९८....फेब्रुवारी .............हिवाळा .............................६१.०४१९९९....ऑक्टोबर ............हिवाळा .............................६६.०६२००४....एप्रिल ................उन्हाळा ..............................५४.३०२००९.....एप्रिल ............उन्हाळा ............................५१.५६२०१४....एप्रिल ..............उन्हाळा ............................६१.८५२०१९....एप्रिल ...............उन्हाळा ....................६३.४८

दोनवेळा झाला मतदानावर परिणाम१९८०मध्ये हिवाळ्यात निवडणुका झाल्या तरीही मतदानाचा टक्का कमी होता. ४५.८० टक्के मतदान त्या साली झाले होते. १९९१ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ४८.६७ टक्के मतदान झाले होते. २००९ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ५१.५६ टक्के मतदान झाले होते.

मागच्या निवडणुकीत बऱ्यापैकी मतदान२०१९च्या निवडणुकीत जिल्ह्यात ६३.४८ टक्के मतदान झाले. आजवरच्या निवडणुकींपैकी हे मतदान बऱ्यापैकी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

यंदा मतदानादिवशी तापमान चाळिशी पार असणार१३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. वैशाखात मतदानाची तारीख असून, या काळात उन्हाचा कडाका जास्त असतो. तापमान चाळिशी पार असेल. त्यामुळे मतदानावर तापमानाचा परिणाम होतो की नाही, हे पाहावे लागेल.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४