शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी

By विकास राऊत | Updated: November 24, 2023 19:24 IST

हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्याने मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये, असे पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी शासनाला पत्र पाठविल्याचे वृत्त लोकमतने २४ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्तामुळे मराठा समाजामध्ये महामंडळाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर.तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांना घेरून समाजाची बदनामी करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा आणि जायकवाडीत पाणी सोडण्याचा दुरानव्ये संबंध नसतांना महामंडळाने समाजाची बदनामी केली आहे. या सगळ्याप्रकाराची चौकशी करण्यासाठी शिष्टमंडळाने दुपारपासून सायंकाळपर्यंत महामंडळात ठिय्या देत सगळ्या अधिकाऱ्यांना घेरले. सकल मराठा समाजाने गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कार्यकारी संचालक तिरमनवार यांच्या दालनात ठिय्या सुरू केला. संबंधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करुन आजच जायकवाडी पाणी सोडावे, अशी मागणी करीत शिष्टमंडळ आक्रमक झाले.

आरक्षणासाठी मराठा समाजा राज्यभरात शांतेत आंदोलन करीत असतांना जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी समाजाच्या आंदोलनाची आडकाठी असल्याचे दाखवून महामंडळाने समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय कार्यालयातून आंदोलन बदनाम केले जात आहे. हा सगळा प्रकार गोदावरी पाटबंधारे विभागाच्या पत्रावरुन पुढे आला असून लोकमतने ही बाब उजेडात आणल्यामुळे सरकारी यंत्रणेचे पितळ उघडे पडले.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कराउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजच जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आंदोलक शैलैश भिसे पाटील, प्रा चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, संदीप शेळके, संदीप जाधव, गणेश थोरात, विजय घोगरा, रविंद्र वहाटुळे यांनी केली.

असे आहे पत्रउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात करावी.

जाहीर माफी मागावीहा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणीMaratha Reservationमराठा आरक्षण