शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी

By विकास राऊत | Updated: November 24, 2023 19:24 IST

हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्याने मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये, असे पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी शासनाला पत्र पाठविल्याचे वृत्त लोकमतने २४ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्तामुळे मराठा समाजामध्ये महामंडळाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर.तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांना घेरून समाजाची बदनामी करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा आणि जायकवाडीत पाणी सोडण्याचा दुरानव्ये संबंध नसतांना महामंडळाने समाजाची बदनामी केली आहे. या सगळ्याप्रकाराची चौकशी करण्यासाठी शिष्टमंडळाने दुपारपासून सायंकाळपर्यंत महामंडळात ठिय्या देत सगळ्या अधिकाऱ्यांना घेरले. सकल मराठा समाजाने गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कार्यकारी संचालक तिरमनवार यांच्या दालनात ठिय्या सुरू केला. संबंधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करुन आजच जायकवाडी पाणी सोडावे, अशी मागणी करीत शिष्टमंडळ आक्रमक झाले.

आरक्षणासाठी मराठा समाजा राज्यभरात शांतेत आंदोलन करीत असतांना जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी समाजाच्या आंदोलनाची आडकाठी असल्याचे दाखवून महामंडळाने समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय कार्यालयातून आंदोलन बदनाम केले जात आहे. हा सगळा प्रकार गोदावरी पाटबंधारे विभागाच्या पत्रावरुन पुढे आला असून लोकमतने ही बाब उजेडात आणल्यामुळे सरकारी यंत्रणेचे पितळ उघडे पडले.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कराउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजच जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आंदोलक शैलैश भिसे पाटील, प्रा चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, संदीप शेळके, संदीप जाधव, गणेश थोरात, विजय घोगरा, रविंद्र वहाटुळे यांनी केली.

असे आहे पत्रउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात करावी.

जाहीर माफी मागावीहा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाWaterपाणीMaratha Reservationमराठा आरक्षण