शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

By राम शिनगारे | Updated: August 19, 2023 13:12 IST

एकाच उमेदवाराने सादर केली वेगवेगळी आठ अनुभव प्रमाणपत्रे

छत्रपती संभाजीनगर : आयटीआय संस्थांमधील सुरू असलेल्या नोकरभरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ७७२ पदांची नोकरभरतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकाच उमेदवाराने आठ पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारची बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करून परीक्षा देत गुणवत्ता यादी स्थान पटकावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या पदांचा समावेश आहे. कोणत्याही पदांसाठी अर्ज करताना दोन वर्षे अनुभव प्रमाणपत्र सादर करण्याची अट होती. शेकडो उमेदवारांनी आठही पदांसाठीची एकाच कंपनीकडून वेगवेगळी बनावट अनुभव प्रमाणपत्रे हस्तगत करीत अर्ज केले. या पदांसाठी वेगवेगळ्या वेळी ऑनलाइन परीक्षा 'टीसीएस' संस्थेने घेतली. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामध्ये भांडारपालाच्या जागेसाठी अनुभव प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार तांत्रिक पदासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षा देऊन प्राथमिक गुणवत्ता यादीत झळकला. विशेष म्हणजे शेकडो उमेदवारांनी आठही जागांसाठी बनावट अनुभव प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा दिल्याचे गुणवत्ता यादीवरून स्पष्ट झाले आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना पायबंद घालण्याची मागणी 'डीव्हीईटी' संचालकांकडे उमेदवारांनी केली आहे. याविषयी 'डीव्हीईटी'चे संचालक दिगंबर दळवी यांना विचारले असता, त्यांनी याविषयी काहीही बोलायचे नसल्याचे सांगितले.

...तर उच्च न्यायालयात धाव घेणारबनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे सर्वच जागांवर परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यापूर्वी संबंधितांचे अनुभव प्रमाणपत्र तपासून घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन डीव्हीईटीच्या संचालकांना दिले. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार सुभाष सुसलादे, राम शिंदे, शुभम दसे, विकास सोनवणे आदींनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजीEducationशिक्षण