शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काय सांगता? ७ हजारांवर आजार दुर्मीळ; लाखो लोकांमध्ये होतो एखाद्याला, नावेही आहेत अवघड

By संतोष हिरेमठ | Updated: February 29, 2024 19:45 IST

‘नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसिज’च्या अंतर्गत ५० लाखांपर्यंत मदत

छत्रपती संभाजीनगर : सर्दी, खोकल्यासह हृदयविकार, मधुमेह, लकवा यासह काही मोजके आजार सर्वसामान्यांना माहीत आहेत. या आजारांचे रुग्ण नेहमीच आढळतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, तब्बल ७ हजारांवर आजार हे दुर्मीळ आहेत. लाखोंमध्ये एखाद्याला हे दुर्मीळ आजार होतात. छत्रपती संभाजीनगरमध्येही अशा अनेक दुर्मीळ आजारांच्या रुग्णांचे निदान होते आणि उपचारही होतात बरं का.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी, जागतिक दुर्मीळ आजार दिन (रेअर डिसिज डे) पाळण्यात येतो. दुर्मीळ आजार आणि त्यांच्या परिणामाबद्दल जनमानसात जागृती निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा दिवस पहिल्यांदा २००८ साली युरोपच्या दुर्मीळ आजार संघटनेने साजरा केला. ८० टक्के दुर्मीळ आजार हे जनुकीय (जेनेटिक) आहेत. जनुकीय म्हणजे शरीरातील पेशींमध्ये असणारी गुणसूत्रे (क्रोमोसोम) व ‘डीएनए’च्या बदलामुळे होणारे आजार होय. ५० टक्के आजारांची लक्षणे जन्मतःच सुरू होतात. या आजारांचे स्वरूप बऱ्याचदा गंभीर असतात. त्यांच्यावरचे उपचार महाग असतात किंवा आजारांवर उपचार नाहीत. यातील ५० टक्के बालके ५ वर्षांच्या आत आजाराला बळी पडतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

४ वर्षांच्या रुग्णाला हा दुर्मीळ आजार, ५० लाखांची मदतमार्च २०२१ मध्ये भारत सरकारने दुर्मीळ आजार पॉलिसी अस्तित्वात आणली. ‘नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसिज’च्या अंतर्गत रुग्णासाठी वर्षाला ५० लाख रुपयांची तरतूद आहे. शहरात ‘गौचर डिसिज’ या दुर्मीळ आजाराने ग्रस्त ४ वर्षांच्या रुग्णावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजारात यकृतावर सूज येणे, रक्तपेशी कमी होणे, हाडे मोडणे इ. लक्षणे दिसतात. या रुग्णाला ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

देशात ८ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’‘नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसिज’च्या अंतर्गत दुर्मिळ आजाराच्या उपचारात यकृत, मूत्रपिंड, बोनमॅरो प्रत्यारोपण, विशिष्ट औषधे उपलब्ध करून दिली जातील. यामध्ये नोंदणीसाठी भारतात सध्या ८ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आहेत. राज्यात मुंबईतील केईएम हाॅस्पिटल येथे हे सेंटर आहे. छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात जनुकीय आजार क्लिनिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

८० टक्के दुर्मीळ आजार जनुकीय८० टक्के दुर्मीळ आजार हे जनुकीय आजार आहेत. घाटी रुग्णालयातही काही दुर्मीळ आजारांचे निदान आणि उपचार होतात.- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी

रुग्णांच्या आशा पल्लवित‘नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसिज’च्या अंतर्गत रुग्णासाठी वर्षाला ५० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद आहे. शहरातील एका चार वर्षांच्या रुग्णाला ही मदत मिळाली आहे. यामुळे कायमच दुर्लक्षित असलेल्या दुर्मीळ आजारांच्या रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.- डाॅ. सुवर्णा मगर, जनुकीय आजारतज्ज्ञ

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य