शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मराठवाड्यावर घाेंघावतेय ओल्या दुष्काळाचे संकट; धरणे तुडूंब,पावसाचे ४५ दिवस आणखी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:40 IST

सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस : विभागातील सात धरणे तुडुंब भरण्याच्या दिशेने

औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ८३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळ्याचे ४५ दिवस शिल्लक असून, या काळात सरासरीच्या १७ टक्क्यांपेक्षा जास्तीचा पाऊस झाला तर विभागाला यंदाही ओल्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये सुमारे ८७ टक्के जलसाठा आहे. यांतील सात प्रकल्प तुडुंब होण्यासारखी परिस्थिती आहे.ऑगस्ट महिन्यात आजवर विभागात ५० मि.मी. पाऊस झाला आहे. १६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत ५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मि.मी. आहे.

४५० पैकी २०७ मंडळांत आजवर अतिवृष्टी झाली आहे. ५२ नागरिकांना पावसाळ्यातील विविध घटनांमध्ये जीव गमवावा लागला; तर लहान-मोठी मिळून ७४६ जनावरे मृत झाली. ८ हजार १२२ मालमत्तांची पडझड झाली असून यांतील ४४२ मालमत्ता मदतीस पात्र ठरविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ७ हजार १३३ मालमत्ता नांदेड जिल्ह्यातील आहेत.

४ लाख ४८ हजार हेक्टरचे नुकसान४ लाख ४८ हजार ७५४ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. ७ लाख ४ हजार ९९५ शेतकऱ्यांचे हे नुकसान असून त्यांना अद्याप कुठलीही शासकीय मदत जाहीर नाही. ३० गावांमधील १५४२ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. शासनाने केलेल्या घोषणेनुसार ७५० कोटी रुपयांची मदत भरपाईसाठी लागणार आहे. जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दुप्पट नुकसानभरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी १० ऑगस्टला जाहीर केले. त्यांच्या घोषणेनुसार मराठवाड्यात भरपाईसाठी अंदाजे ७५० कोटी रुपये लागतील. गेल्या आठवड्यात पाऊस, पिकांचे नुकसान वाढले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १ लाखाने वाढली आहे.

११ प्रकल्पांत ८७ टक्के जलसाठाविभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ८७ टक्के जलसाठा आहे. यात जायकवाडीमध्ये ९५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ६९, येलदरी ८७, सिद्धेश्वर ९७, माजलगाव ५४, मांजरा ३९, पैनगंगा ९३, मानार ९९ टक्के; तर निम्न तेरणा ९०, विष्णुपुरी ७४ टक्के जलसाठा आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात ३० टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती