शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठवाड्यावर घाेंघावतेय ओल्या दुष्काळाचे संकट; धरणे तुडूंब,पावसाचे ४५ दिवस आणखी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:40 IST

सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस : विभागातील सात धरणे तुडुंब भरण्याच्या दिशेने

औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ८३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळ्याचे ४५ दिवस शिल्लक असून, या काळात सरासरीच्या १७ टक्क्यांपेक्षा जास्तीचा पाऊस झाला तर विभागाला यंदाही ओल्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये सुमारे ८७ टक्के जलसाठा आहे. यांतील सात प्रकल्प तुडुंब होण्यासारखी परिस्थिती आहे.ऑगस्ट महिन्यात आजवर विभागात ५० मि.मी. पाऊस झाला आहे. १६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत ५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मि.मी. आहे.

४५० पैकी २०७ मंडळांत आजवर अतिवृष्टी झाली आहे. ५२ नागरिकांना पावसाळ्यातील विविध घटनांमध्ये जीव गमवावा लागला; तर लहान-मोठी मिळून ७४६ जनावरे मृत झाली. ८ हजार १२२ मालमत्तांची पडझड झाली असून यांतील ४४२ मालमत्ता मदतीस पात्र ठरविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ७ हजार १३३ मालमत्ता नांदेड जिल्ह्यातील आहेत.

४ लाख ४८ हजार हेक्टरचे नुकसान४ लाख ४८ हजार ७५४ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. ७ लाख ४ हजार ९९५ शेतकऱ्यांचे हे नुकसान असून त्यांना अद्याप कुठलीही शासकीय मदत जाहीर नाही. ३० गावांमधील १५४२ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. शासनाने केलेल्या घोषणेनुसार ७५० कोटी रुपयांची मदत भरपाईसाठी लागणार आहे. जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दुप्पट नुकसानभरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी १० ऑगस्टला जाहीर केले. त्यांच्या घोषणेनुसार मराठवाड्यात भरपाईसाठी अंदाजे ७५० कोटी रुपये लागतील. गेल्या आठवड्यात पाऊस, पिकांचे नुकसान वाढले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १ लाखाने वाढली आहे.

११ प्रकल्पांत ८७ टक्के जलसाठाविभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ८७ टक्के जलसाठा आहे. यात जायकवाडीमध्ये ९५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ६९, येलदरी ८७, सिद्धेश्वर ९७, माजलगाव ५४, मांजरा ३९, पैनगंगा ९३, मानार ९९ टक्के; तर निम्न तेरणा ९०, विष्णुपुरी ७४ टक्के जलसाठा आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात ३० टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती