शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:54 IST

१६ महिने काम; साडेअकरा कोटींचा खर्च, तरीही नागरिक व व्यावसायिकांचे हाल मात्र सुरूच

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्ग पूर्ण करण्यासाठी १ वर्षाची मुदत होती. मात्र, या मुदतीत भुयारी मार्ग पूर्ण झाला नाही. फेब्रुवारीत कसाबसा भुयारी मार्ग खुला झाला. परंतु, पाण्याचा निचरा करण्याचे काम, छताचे काम बाकीच आहे. परिणामी, वाहनधारकांसह नागरिकांना वारंवार फटका बसत आहे. भुयारी मार्ग तयार होऊनही शहरातून देवळाई-सातारा परिसराकडून ये-जा करणारी वाहतूक सुरळीत व्हावी, हा मूळ हेतू सफल होत नाही.

भुयारी मार्गानंतर व्यवसायात ४० टक्के घटभुयारी मार्गाच्या दुतर्फा जवळपास ५० दुकाने आहेत. भुयारी मार्गातून पादचारी, वाहनधारक ये-जा करतात. त्यामुळे व्यवसायात जवळपास ४० टक्के घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अडीच महिन्यांत ३ वेळा तुंबले पाणी१८ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि दुरवस्था समोर आली. त्यानंतर १२ जुलै व २५ जुलै रोजी पुन्हा या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.

११.४७ कोटी निधी खर्चशिवाजीनगर भुयारी मार्गाची ३.५ मीटर उंची आहे. या मार्गासाठी ११.४७ कोटी निधी खर्च झाला. मात्र, भुयारी मार्गात पाणी एकीकडे साचते आणि पाणी निचरा होण्याची जागा दुसरीकडे, अशी अवस्था आहे.

१२ महिने होती मुदत, प्रत्यक्षात १६ महिनेशिवाजीनगर भुयारी मार्ग प्रकल्प १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ॲाक्टोबर २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, काम कासवगतीने चालले. त्यामुळे ४ महिने अधिक लागले. त्यातही अनेक कामे अर्धवट असताना भुयारी मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. अद्यापही प्रकल्प अपूर्णच आहे.

व्यवसायावर परिणामभुयारी मार्ग झाल्यापासून व्यवसायात जवळपास ४० ते ५० टक्के घट झाली आहे. पत्रे बसविल्यानंतर भुयारी मार्गात पाणी तुंबणार नाही, अशी शक्यता वाटत नाही.- रवींद्र पवार, व्यावसायिक

आता पुन्हा मार्ग बंद नकोभुयारी मार्ग आता पुन्हा कधी बंद होता कामा नये. तो कायम सुरू राहील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिकांची पुन्हा गैरसोय होता कामा नये.- आबासाहेब आहेर, नागरिक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका