शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:54 IST

१६ महिने काम; साडेअकरा कोटींचा खर्च, तरीही नागरिक व व्यावसायिकांचे हाल मात्र सुरूच

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्ग पूर्ण करण्यासाठी १ वर्षाची मुदत होती. मात्र, या मुदतीत भुयारी मार्ग पूर्ण झाला नाही. फेब्रुवारीत कसाबसा भुयारी मार्ग खुला झाला. परंतु, पाण्याचा निचरा करण्याचे काम, छताचे काम बाकीच आहे. परिणामी, वाहनधारकांसह नागरिकांना वारंवार फटका बसत आहे. भुयारी मार्ग तयार होऊनही शहरातून देवळाई-सातारा परिसराकडून ये-जा करणारी वाहतूक सुरळीत व्हावी, हा मूळ हेतू सफल होत नाही.

भुयारी मार्गानंतर व्यवसायात ४० टक्के घटभुयारी मार्गाच्या दुतर्फा जवळपास ५० दुकाने आहेत. भुयारी मार्गातून पादचारी, वाहनधारक ये-जा करतात. त्यामुळे व्यवसायात जवळपास ४० टक्के घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अडीच महिन्यांत ३ वेळा तुंबले पाणी१८ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि दुरवस्था समोर आली. त्यानंतर १२ जुलै व २५ जुलै रोजी पुन्हा या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.

११.४७ कोटी निधी खर्चशिवाजीनगर भुयारी मार्गाची ३.५ मीटर उंची आहे. या मार्गासाठी ११.४७ कोटी निधी खर्च झाला. मात्र, भुयारी मार्गात पाणी एकीकडे साचते आणि पाणी निचरा होण्याची जागा दुसरीकडे, अशी अवस्था आहे.

१२ महिने होती मुदत, प्रत्यक्षात १६ महिनेशिवाजीनगर भुयारी मार्ग प्रकल्प १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ॲाक्टोबर २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, काम कासवगतीने चालले. त्यामुळे ४ महिने अधिक लागले. त्यातही अनेक कामे अर्धवट असताना भुयारी मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. अद्यापही प्रकल्प अपूर्णच आहे.

व्यवसायावर परिणामभुयारी मार्ग झाल्यापासून व्यवसायात जवळपास ४० ते ५० टक्के घट झाली आहे. पत्रे बसविल्यानंतर भुयारी मार्गात पाणी तुंबणार नाही, अशी शक्यता वाटत नाही.- रवींद्र पवार, व्यावसायिक

आता पुन्हा मार्ग बंद नकोभुयारी मार्ग आता पुन्हा कधी बंद होता कामा नये. तो कायम सुरू राहील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिकांची पुन्हा गैरसोय होता कामा नये.- आबासाहेब आहेर, नागरिक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका