शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
2
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
3
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
4
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
5
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
6
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
7
७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा
8
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
9
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
10
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
11
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
12
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
13
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
14
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
15
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
16
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
17
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
18
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
19
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
20
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका

जायकवाडीचे पाणी पळविण्याचा ‘उद्योग’; पाणी कधी आणि किती पोहोचणार याची प्रतीक्षाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 4:20 PM

जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्गमात्र पाणी कधी पोहोचणार?

औरंगाबाद : जायकवाडीचे पाणी पळविण्याचा उद्योग गुरुवारीदेखील कायम राहिला. ओझर बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गात गुरुवारी ४५७ वरून १४७६ क्युसेकपर्यंत वाढ झाली; परंतु याठिकाणी डाव्या कालव्यातून होणारा विसर्ग थांबलेला नव्हता. त्यामुळे जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भंडारदऱ्यातून १ हजार ५७४ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडून, निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. निळवंडेचा हा विसर्ग गुरुवारीही कायम होता. ओझर बंधाऱ्यातून बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीसाठी अवघ्या ४५७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नेवासामार्गे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. या दिवशी डाव्या कालव्यातून ८०५, तर उजव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. यामध्ये सायंकाळी उजवा कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला; परंतु डाव्या कालव्यातील विसर्ग गुरुवारीही कायम होता. या कालव्यातून ८५० क्युसेकने विसर्ग सुरू होता.  

ओझर बंधाऱ्यातून बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली. सायंकाळपर्यंत १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूहोता. हा विसर्ग पाहता आता जायकवाडीला कधी आणि किती पाणी पोहोचणार,याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कालव्याला सोडण्यात आलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीच्या शक्यतेने जायकवाडीला पोहोचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. दरम्यान,  ओझर बंधारा येथील सुरूअसलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे निळवंडेतील पाणी ओझर बंधारामार्गे शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नेवाशाला आज पोहोचणार

ओझर बंधारा येथील सुरू असलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पोहोचेल,असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. 

निळवंडेतून १.८० टीएमसीयापूर्वी नियोजित पाणी सोडण्यापूर्वीच निळवंडेतून विसर्ग थांबविण्यात आला होता. केवळ रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे (रोटेशन) जायकवाडीचे पाणी अडविण्यात आले होते. हे रोटेशन संपल्यानंतरच म्हणजे बुधवारपासून निळवंडेतून पुन्हा विसर्ग झाला. निळवंडेतून १.८० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे; परंतु पाणी वळविण्याच्या प्रकारामुळे जायकवाडीत अपेक्षित पाणी पोहोचणार नसल्याचे दिसते.

आतापर्यंतची परिस्थितीनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीत ८.९९ पैकी किमान ६ टीएमसी पाणी येणार होते. प्रत्यक्षात वरच्या भागात पाणी चोरीने जायकवाडी धरणात केवळ ३.८० टीएमसी पाणी पोहोचले आहे. प्रत्यक्षात २.२० टीएमसी पाणी आलेले नाही. जायकवाडीसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत ७.४७ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. निळवंडेतून येणाऱ्या पाण्यानंतरही ६ टीएमसीचा पल्ला गाठणे अवघड दिसते. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीMarathwadaमराठवाडाNashikनाशिकAhmednagarअहमदनगर