शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
2
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
3
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
4
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
5
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
6
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
7
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
8
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
9
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
10
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
11
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
12
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
13
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
14
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
15
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
16
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
18
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
19
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
20
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

मराठवाड्यात पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी; नागरिकांची घागर रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:17 IST

विभागीय आयुक्तांच्या संवादात पाणी-पाणी; पाणीटंचाईच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी ठरल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या ‘संवाद मराठवाड्याशी’ या ऑनलाईन उपक्रमात अनेक नागरिकांनी पाणीपुरवठ्यावरून बुधवारी ओरड केली.

टंचाईग्रस्त भागातील अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व यंत्रणांना दिले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जेथे मागणी होईल तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, असेही आयुक्तांनी आदेशित केले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आगामी कालावधीत योजना गतीने पूर्ण केल्या तर टँकर व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही. महानगरातील पाणी वितरणाबाबतचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. यामध्ये पाणी वितरणात जास्त अंतर असणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विजय कोळी उपस्थित होते.

नागरिकांनी केलेल्या तक्रारी अशा..परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे व्योमकेश यांनी जलजीवन मिशनच्या कामातील अडचणींचा पाढा वाचला. हिंगोलीतील वसमत येथून मारोती बनसोडे यांनी पाइपलाइनची गळती, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून संदीप वानखेडे यांनी गावातील अवैध पाणी वापर, बीड शहरातून डी. जी. तांदळे यांनी बीड शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी, एन-७ सिडको छत्रपती संभाजीनगर येथील प्रणीत वाणी यांनी शहर पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाल्याची तक्रार केली. लातूर येथील अरविंद शिंदे यांनी खासगी टँकरच्या अडचणी मांडल्या. बैठकीतील अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईबाबत शासनाच्या वतीने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

पिण्यासाठी राखीव पाणीसाठ्याची दक्षता घ्या...संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पाणीटंचाई उपाययोजना करताना अल्प व दीर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे. विभागातील ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी. पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी.-दिलीप गावडे, विभागीय आयुक्त

टॅग्स :Marathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाई