शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

मराठवाड्यात पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी; नागरिकांची घागर रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:17 IST

विभागीय आयुक्तांच्या संवादात पाणी-पाणी; पाणीटंचाईच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी ठरल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या ‘संवाद मराठवाड्याशी’ या ऑनलाईन उपक्रमात अनेक नागरिकांनी पाणीपुरवठ्यावरून बुधवारी ओरड केली.

टंचाईग्रस्त भागातील अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व यंत्रणांना दिले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जेथे मागणी होईल तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, असेही आयुक्तांनी आदेशित केले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आगामी कालावधीत योजना गतीने पूर्ण केल्या तर टँकर व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही. महानगरातील पाणी वितरणाबाबतचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. यामध्ये पाणी वितरणात जास्त अंतर असणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विजय कोळी उपस्थित होते.

नागरिकांनी केलेल्या तक्रारी अशा..परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे व्योमकेश यांनी जलजीवन मिशनच्या कामातील अडचणींचा पाढा वाचला. हिंगोलीतील वसमत येथून मारोती बनसोडे यांनी पाइपलाइनची गळती, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून संदीप वानखेडे यांनी गावातील अवैध पाणी वापर, बीड शहरातून डी. जी. तांदळे यांनी बीड शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी, एन-७ सिडको छत्रपती संभाजीनगर येथील प्रणीत वाणी यांनी शहर पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाल्याची तक्रार केली. लातूर येथील अरविंद शिंदे यांनी खासगी टँकरच्या अडचणी मांडल्या. बैठकीतील अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईबाबत शासनाच्या वतीने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

पिण्यासाठी राखीव पाणीसाठ्याची दक्षता घ्या...संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पाणीटंचाई उपाययोजना करताना अल्प व दीर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे. विभागातील ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी. पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी.-दिलीप गावडे, विभागीय आयुक्त

टॅग्स :Marathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाई